अहमदनगर : कोरोना व्हायरसमुळे देशभरात भितीचे वातावरण आहे. महाराष्ट्रासह देशातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावरून आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी आपली भूमिका बजावली नाही, म्हणूनच ही स्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बच्चू कडू म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या भूमिका बजावायला पाहिजे होत्या, त्या त्यांनी बजावल्याच नाही. त्यामुळे आज जी आपत्ती आली आहे ती देशासोबत राज्यावर येऊन पडली आहे. देशात जर योग्य नियोजन झाले असते तर आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते.
लसीवरून बच्चू कडू यांन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, फडणवीस हे राज्याचे नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत… त्यांनी केंद्रात जाऊन लस जास्त द्या किंवा इतर साहित्य द्या अशी मागणी केली का ? राज्य सरकारवर टीका टिपण्णी करण्यापेक्षा केंद्रातून काय आणले याचे उदाहरण द्यावे आणि बोलावे, असा टोला त्यांनी लगावला.
बच्चू कडू यांनी अहमदनगरला प्रहार कोव्हिड सेंटरची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज देशात सर्वात चांगले व्यवस्थापन हे महाराष्ट्रात केलं जातं आहे. तसेच मुंबईचे तर जागतिक पातळीवर कौतुक होतं आहे. जरी केंद्र सरकार दुजाभाव करत असेल तरी राज्य मात्र खंबीर असल्याचे ते म्हणाले.
Read Also :
- ‘ती निवडणुकीसाठीची जुमलेबाजी होती, हे केंद्र सरकार स्वतःच सिद्ध करत आहे’
- ‘ठाकरे सरकारचा अनलॉकबाबत ठोस ‘एक्झिट प्लॅन’ काय?’
- ‘स्वतःच्या कौतुकाची टिमकी वाजवणाऱ्या ठाकरे सरकारचे न्यायालयानेच वाभाडे काढले’
- ‘पटोले हे विनोदी कलावंत, त्यांना गांभीर्याने घ्यायचे कारण नाही’
- एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या बदलीला ब्रेक, मॅटकडून स्थगिती