मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ०४ जून रोजी लागणार आहे. मात्र त्याआधीच आता राज्यात विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजू लागलं आहे. अशातच मुंबईत आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचं चिंतन शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी भाजपने आम्हाला ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिल्याचं भुजबळांनी सांगितलं आहे. त्यामुळे महायुतीत अजित पवार गटाला ८० जागा मिळाल्यास भाजप अन् शिंदेंना किती जागा मिळणार ? याची जोरदार चर्चा सुरू झालीय.
सत्तेत सहभागी होतांना भाजपने विधानसभेला ८० ते ९० जागा लढवू देण्याचा शब्द दिला होता, तो पाळला जावा. आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळायलाच हवा. विधानसभेला लोकसभेसारखी खटपट व्हायला नको. असं भुजबळांनी म्हटलं आहे. तसेच आधीच सांगून द्यायलं हवं की, आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत. हे आधीच आपल्याला त्यांना सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर ५० ते ६० निवडून येणार. ५० च घ्यायच्या अन्. मग त्यातल्या काही गळाल्या की आम्ही खाली येणार असेही भुजबळांनी सांगितलं.
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
छगन भुजबळ यांच्या विधानानुसार विधानसभेला अजित पवार गटाला ८० ते ९० जागा मिळाल्यास शिंदे गटाला देखील तितक्याच बहुधा त्यापेक्षा जास्त जागांची मागणी केली जाऊ शकते. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडे २८८ पैकी १०५ आमदार आहेत. यानुसार या निवडणुकीत भाजप १५० जागा लढवू शकतात. तर शिंदे गटाला देखील अजित पवारांच्या एवढ्याच एव्हाना दहा पंधरा जागा देण्याची शक्यता आहे.
यातच महायुतीत अजूनही काही घटक पक्ष आहेत. त्यांचा देखील भाजपला विचार करावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत देखील असाच गोंधळ बघायला मिळणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं गणितं राज्यात वरिष्ठ नेते कसं मांडणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पुणे पोलिसांना कुठून किती हप्ता मिळतोय, ? धंगेकर थेट यादीच घेऊन पोहचले कार्यालयात”
हेही वाचा..“०४ जूननंतर महाराष्ट्रात चमत्कार घडणार असून महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल”
हेही वाचा..विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप अन् मनसे आमनेसामने, कोण जिंकणार ?
हेही वाचा..अग्रवाल कुटुंबीय कायद्याच्या कचाट्यात चांगलेच अडकले, दुसरी तक्रार दाखल, प्रकरण काय ?
हेही वाचा…“फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, जे हळू हळू समोर येतील”