प्रतिनिधी : ओंकार गोरे
मुंबई : आजघडीला कोकणातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये नारायण राणे आपले स्थान टिकवून आहेत. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेटपणे अंगावर घेणाऱ्या नेत्यांची नावे घ्यायची झाली तर त्यामध्ये नारायण राणे हे नाव अग्रस्थानी असेल. एकेकाळी बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असणारे नारायण राणे काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा प्रवास करुन आता भाजपमध्ये स्थिरावले आहेत.
नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद देऊन, भाजपने खेळली मोठी राजकीय खेळी; नेमकं गणित काय? वाचा सविस्तर
नारायण राणे हे फायटर नेते म्हणून ओळखले जातात. राजकारणात अनेक चढउतार पाहणाऱ्या या नेत्याने आपला दबदबा मात्र कायम राखला. ६९ वर्षीय नारायण राणे गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात असून केंद्रात मंत्री म्हणून काम करत असताना मात्र त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात पहिलं स्थान पटकावणाऱ्या राणे यांचा राजकीय प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे.
कोण आहेत नारायण राणे?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे गावात राणे यांचा जन्म झाला. नारायण तातू राणे असे त्यांचे पुर्ण नाव असून २० एप्रिल १९५२ रोजी जन्म झाला. मोठा जनाधार असलेल्या कोकणातील नेत्यांमध्ये नारायण राणेंचा समावेश होतो. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आक्रमक स्वभावाचे नारायण राणे शिवसेनेत वेगाने पायऱ्या चढत वर गेले. सुरुवातीला चेंबुरमध्ये शाखाप्रमुख असलेले राणे १९८५ साली मुंबई महानगरापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९९० साली कणकवली-मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. १९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय विकास, पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला.
केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान, मुंडे भगीनींचे पंक छाटण्याचा प्रयत्न?
१९९७ साली त्यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात आले. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर १९९८ ते ९९ या काळात त्यांनी या पदाची धुरा सांभाळली. २००५ साली शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले. २००८ मध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला गेला. २००९ मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळाले.
‘’ज्यांना तुम्ही शत्रू समजता त्यांना आम्ही किंमत ही देत नाही’’ निलेश राणे म्हणतात…
२००९ मध्ये पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची कारवाई झाली. पक्षश्रेष्ठींची माफी मागितल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेतली गेली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राणेंनी काँग्रेससोबतही घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये त्यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या पक्षाची स्थापना केली. ३ एप्रिल २०१८ मध्ये नारायण राणे यांची भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर निवड झाली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर राणेंची एकहाती सत्ता आहे. राणे यांचे स्वतःचे सिंधुदुर्गात इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आणि अत्याधुनिक हॉस्पिटल असून ७ जुलै २०२१ रोजी त्यांनी मोदींच्या मंत्रीमंडळात मंत्रीपदाची शपत घेतली.
हऱ्या – नाऱ्या टोळीची दहशत
‘’बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखे वागतील असे वाटले नव्हते’’
राजकारणात येण्याअगोदर नारायण राणे यांनी मुंबईतील चाळीतल्या मित्रासोबत सुभाष नगर येथे चिकन शॉप सुरु केले होते. १९६० साली हऱ्या – नाऱ्या टोळीची मुंबईत दहशत होती. या टोळीसोबत राणेंचे संबंध आले आणि त्यांचे नाव सगळीकडे पोहोचले. हऱ्या – नाऱ्या जिंदाबाद या नावाने एक चित्रपट सुध्दा त्या काळात येऊन गेला. याच काळात नारायण राणे यांच्या नावाने खुनाचा गुन्हा देखील घटाला पोलीस स्टेशनला नोंद झाला होता. पोलीस रेकॉर्ड नुसार वयाच्या १४ व्या वर्षी राणे टोळीचे सदस्य झाले. माधव ठाकूर व राणे यांचा वाद या काळात बराच गाजला.
…म्हणून कट्टर शिवसैनिकाचा घटस्फोट झाला
बाळासाहेब ठाकरे यांनी २००३ साली महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी नारायण राणे प्रचंड दुखावले गेले. उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी गेली, असे राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. १९९९ मध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या नारायण राणे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार पाडण्याच पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षित साथ मिळाली नाही, असे नारायण राणे यांचे म्हणणे आहे.
‘नारायण राणेंपेक्षा संभाजीराजेंना मंत्री केलं असतं तर महाराष्ट्राचा सन्मान झाला असता’
याच काळात उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई आणि मनोहर जोशी यांना हाताशी धरुन नारायण राणे यांना विरोधी पक्षनेतेपदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे नारायण राणे यांची शिवसेनेत घुसमट होऊ लागली. अखेर २००५ साली नारायण राणे हे आपल्या समर्थकांसह शिवसेनेतून बाहेर पडले.
राणेंनी काँग्रेस का सोडली?
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नारायण राणे स्वस्थ नव्हते. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती. यातूनच ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं त्यांच्याचविरोधात राणेंनी आघाडी उघडली. २००९ मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळालं. याच दरम्यान सोनिया गांधी, अहमद पटेल, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करून राणेंनी हायकमांडची खप्पामर्जी ओढावून घेतली. पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पक्षश्रेष्ठींची माफी मागितल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेतली गेली. त्यांमुळे काँग्रेसलाही राणेंनी घटस्फोट दिला.
राणेंचे आत्मचरित्र
शिवसेनेतून फुटून आलेल्या दोन नेत्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव राहिला. एक म्हणजे भुजबळ व दुसरे राणे. भुजबळ तुरुंगात गेल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर नियंत्रण आले. राणेंचे मात्र तसे नाही. ते आजही राज्याच्या राजकारणाची गणिते बदलू शकतात. राणेंनी नवा पक्षही स्थापन केला आहे. त्यांनी ‘No Holds Barred – My Years in Politics’ (कोणतेही तत्त्व किंवा नियम लागू नसलेलं भांडण) असे आत्मचरित्रही लिहिले आहे. त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यात त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख मांडला आहे. नो होल्ड्स बार्ड ( ‘झंझावात’) असे आणखी एक आत्मचरित्र राणेंचे आहे.
‘’ज्यांना तुम्ही शत्रू समजता त्यांना आम्ही किंमत ही देत नाही’’ निलेश राणे म्हणतात…
राणेंना मंत्रिपद देऊन भाजपने सेनेला काय संदेश देणार ?
राजकीय विश्लेषकांच्या मते राणेंना केंद्रात मंत्रिपद दिल्याने पहिली शक्यता म्हणजे भविष्यात सेना-भाजप युती होईल या चर्चेला ब्रेक लागेल. कारण नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक कटुता आहे. वैचारिक मतभेद वगैरे नाहीयेत. उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंनी व्यक्तिगत स्वरूपाची टीका केलीये. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तर आदित्य ठाकरेंवर त्यांनी थेट आरोप केले होते. त्यामुळे राणेंसोबत कोणत्याही पद्धतीने जोडले जाणे उद्धव ठाकरे पसंत करणार नाहीत. दुसरी शक्यता म्हणजे भविष्यात युती झालीच तर ती आपल्याच अटीशर्तींवर होईल, असा संदेशही भाजप शिवसेनेला देऊ पाहत आहे. उद्धव ठाकरे यांचे नारायण राणेंसोबत कितीही मतभेद असले, तरी आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेणारच असा ठामपणा दाखवत भाजप आपण युती करताना नमतं घेणार नाही किंवा तडजोड करणार नाही असं सांगू पाहात आहे.
Read Also :
- चर्चा होती राजीनाम्याची, मात्र लॉटरी लागली थेट राज्यमंत्रीपदाची! मोदींकडून ‘दाजींना’ मोठे गिफ्ट
- एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल; भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी खडसे दाम्पत्याला अटक होणार?
- अधिवेशातील राड्यानंतर आमदार भास्कर जाधव यांना सुरक्षा, गृह खात्याचा निर्णय
- ‘’ज्यांना तुम्ही शत्रू समजता त्यांना आम्ही किंमत ही देत नाही’’ निलेश राणे म्हणतात…
- मनसे आमदार राजू पाटील हे ईडी कार्यालयात गेल्याने राज्यात राजकीय चर्चेला उधाण