मुंबई : काल पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात असलेल्या भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या मंत्री मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम पार पडला. या मंत्रीमंडळ फेरबदलात, काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळाला, काहींच्या खात्यात फेरबदल झाले, तर एकूण ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामुळे आता, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ५३ वरून ८१ झाली आहे. यात राज्यातून ४ जणांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे.
‘नारायण राणेंपेक्षा संभाजीराजेंना मंत्री केलं असतं तर महाराष्ट्राचा सन्मान झाला असता’
दरम्यान, या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी, राज्यातले दिल्लीत असलेले केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्त केल्याची बातमी सगळीकडे प्रसारित करण्यात आली. त्यांची कामगिरी चांगली नसल्याने, त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. काल एकामागोमाग एक अशा १२ मंत्र्यांनी राजीनामा दिले, त्यातच दानवेंनीही राजीनामा दिल्याचं वृत्त आलं. यामुळे राज्यातल्या त्यांच्या समर्थकांचा हिरमोड झालाच, पण राज्यातल्या भाजप नेत्यांना याबद्दल विचारले असता, त्यांनी देखील यावर बोलण्यास नकार दिला.
केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान, मुंडे भगीनींचे पंक छाटण्याचा प्रयत्न?
मात्र, कालांतराने अखेर राजीनामा दिल्याची यादी जेव्हा समोर आली. तेव्हा त्यात रावसाहेब दानवे यांच्या नावाचा सामावेश नव्हता. त्यामुळे त्यांच्या या केवळ अफवा होत्या, या वृत्ताला दुजोरा मिळाला. यांनतर याबाबदल त्यांना विचारले असता, “पक्षाकडून राजीनाम्याबद्दल कोणाचाही फोन आलेला नाही. तसेच, मला राजीनामा देण्यासही कुणी सांगितलेले नाही,” असं दानवे यांनी स्पष्ट केलं. “पक्षाध्यक्षांचा निर्णय सगळ्यांना शिरसावंद्य असतो. धोत्रेंचा राजीनाम्यानंतर, त्याच दरम्यान मी दिल्लीसाठी विमानात बसलो. त्यामुळे कदाचित हा गैरसमज समाज माध्यमांमध्ये झाला. पण, तसं काही नसून, कुणीही मला काहीही सांगितलं नाहीये,” असंही ते म्हणाले.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या नारायण राणेंकडे कोणतं खातं?
यातच आता, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्य मंत्रीपदाची जबाबदारी असलेल्या दानवेंना, या मंत्रीमंडळ विस्तारात लॉटरी लागली असून, त्यांच्याकडे आता रेल्वे राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे, मोदींच्या या मंत्रिमंडळ विस्तारात दानवेंचे वजन अजून वाढल्याची चर्चा असली, तरी कालच्या या राजीनाम्याची चर्चा त्यापेक्षा जास्त होती.
Read Also :
- एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल; भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी खडसे दाम्पत्याला अटक होणार?
- अधिवेशातील राड्यानंतर आमदार भास्कर जाधव यांना सुरक्षा, गृह खात्याचा निर्णय
- ‘’ज्यांना तुम्ही शत्रू समजता त्यांना आम्ही किंमत ही देत नाही’’ निलेश राणे म्हणतात…
- मनसे आमदार राजू पाटील हे ईडी कार्यालयात गेल्याने राज्यात राजकीय चर्चेला उधाण
- भोसरी जमीन आर्थिक घोटाळा: जावयाच्या अटकेनंतर आता एकनाथ खडसेंना दणका, ईडीकडून चौकशीचे समन्स