मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. नारायण राणे यांना बुधवारी संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर राणेंपेक्षा संभाजीराजेंना मंत्री केलं असतं तर महाराष्ट्राचा सन्मान झाला असता असं म्हणत शिवसेनेने नारायण राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.
हे पण वाचा: केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान, मुंडे भगीनींचे पंक छाटण्याचा प्रयत्न?
हे पण वाचा: पक्ष वाढविण्यासाठी वाटेल ते, आयारामांना मंत्रीपद, निष्ठावंतांना धत्तुरा!
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातलं वैर संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. २००५ पासून म्हणजेच नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हापासून ते महाविकास आघाडी सरकार स्थापन होईपर्यंत शिवसेना आणि नारायण राणे हे एकमेकांवर आरोप प्रत्येआरोपाची झोड उठवण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला असताना शिवसेनेने त्यांच्या धोरणाला साजेशी अशीच प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने नारायण राणे यांच्या मंत्रिपदावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातल्या पाच जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यातलं नारायण राणे यांचं नाव सर्वात वर होतं. गेल्या आठ दिवसांपासून त्यांचं नाव चर्चेत होतं.
हे पण वाचा: भोसरी जमीन आर्थिक घोटाळा : एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक
हे पण वाचा: शिवसेनेला इशारा देण्यासाठीराणेंना मंत्रिपद नाही, चंद्रकांत पाटील म्हणतात….
भाजप आणि शिवसेना यांच्यात २०१९ मध्ये काडीमोड झाला आणि राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सोबत येत सरकार स्थापन केलं आणि भाजपला बाजूला सारलं. नारायण राणे हे तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. कोरोना काळात सरकारने कसं चुकीचं व्यवस्थापन केलं. राज्यात मृत्यू किती वाढले. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप. अशा अनेक प्रसंगी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. असे नारायण राणे हे आता केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यानंतर आता शिवसेनेनेही प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात युती अस्तित्त्वात असतानाही नारायण राणे यांचं भाजपमध्ये जाणं हे शिवसेनेला पसंत नव्हतं. आता केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जी प्रतिक्रिया समोर आली आहे त्या प्रतिक्रियेवर नारायण राणेही तिखट उत्तर देतील हे नक्की.
हे पण वाचा: शिवसेनेशी वैचारिक मतभेद, शत्रुत्व नाही, युतीचा निर्णय योग्य वेळी घेऊ; फडणवीसांचे सूचक विधान
जातीय समीकरण साधण्याचा प्रयत
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना राणेंना भाजपकडून कॅबीनेट मंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. वंजारी समाजाचे भागवत कराड आणि आगरी समाजातून येणारे कपिल पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देऊन ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारती पवार यांना मंत्रीपद देऊन केंद्रात महाराष्ट्रातील आदीसावासी समाजाच प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे.