नवी दिल्ली : काॅंग्रेस पक्षाला सध्या उतरती कळा लागली आहे. कारण की काही दिवसापुर्वीच पंजाबमधील माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अशातच आता काॅंग्रेसला गुजरातमध्ये देखील मोठा धक्का बसला आहे. काॅंग्रेस नेतृत्वाबाबत प्रश्निचिन्ह उपस्थित करत हार्दिक पटेल ने काॅंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक पत्र देखील लिहिलं आहे.
“महागाईमुळे सध्या आमच्या घरात लिंबू सरबत बनतच नाही”; सुप्रिया सुळे
21 व्य़ा शतकात भारत हा युवकांसाठी असलेला सर्वोत मोठा देश असून याठिकाणी युवकांसाठी सक्षम आणि मजबुत नेतृ्त्व हवं आहे. मात्र मागील तीन वर्षापासून काॅंग्रेस पक्षाने फक्त केंद्रामध्ये विरोध दर्शविला आहे. देशातील लोकांना सध्या विरोध नाही तर एक सक्षम विकल्प पक्ष पाहिजे आहे. अयोध्यामधील राम मंदिर, सीएए-एनआरसी, जम्मु काश्मिर चा कलम 370, तसेच जीएसटी साऱखे विषय़ हे लोकांसाठी दिर्घकाळ हवेत. मात्र या विषयामध्ये काॅंग्रेस पक्षाने नेहमी अडचणी निर्माण केल्या आहेत.
ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही, तिथे निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
देशातील काही राज्यांमधून काॅंग्रेस पक्षाला रिजेक्ट का केला आहे, कारण की काॅंग्रेस पक्षाने आणि काॅंग्रेस नेतृत्वाकडे लोकांसाठी बेसिक रोडमॅप नाही. काॅंग्रेस नेतृत्व देशातील कोणत्याही समस्यांसाठी गंभीर नाही. ते नेहमी परेदशात व्यस्त असतात. तसेच काॅंग्रेस पक्षाकडून गुजरात मध्ये खुप अपेक्षा होत्या, मात्र काॅंग्रेस पक्षाने गुजरातमध्ये फक्त अपेक्षा भंग केला आहे. त्य़ामुळे मी काॅंग्रेस पक्षातून राजीनामा देत आहे. असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
‘…आणि म्हणूनच धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही’; नितेश राणेंची खोचक टीका
मला खुप दु:ख व्यक्त करत सांगत आहे की, गुजरातमध्ये सर्वांनाच कळून चुकलं आहे की, गुजरातमधील मोठे राजकीय नेते फक्त आर्थिक फायद्यासाठी लोकांना कमजोर केल जात आहे. राजकारण हे वेगळं असू शकतं. परंतु काॅंग्रेस पक्षातील नेत्यांनी याठिकाणी नेहमी धोका दिला आहे. गुजरातमधील लोकांसाठी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. मात्र काॅंग्रेस पक्षाने माझा नेहमी तिरस्कार केला. अंसही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
Read also:
- संभाजी राजेंचं आमदारांना खुल पत्र; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर”..;
- “अंडी फेकण्याची संस्कृती शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की..”; चंद्रकांत पाटलांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
- शरद पवारांच्या समंतीने राज्यात पुरस्कृत दहशतवाद; भाजपचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
- “दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवून नये”; रोहित पवारांचा सल्ला
- ममता दीदींच्या पावलावर ठाकरे सरकारचे पाऊलं; केंद्र सरकारच्या विरूद्ध धडक कृती मोहीम