मुंबई – महाराष्ट्रातील राज्य सरकार आणि आघाडी सरकारमधील घटक पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकार सुडाची कारवाई करत असल्याचा सातत्याने आरोप करत असतात. राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली. तर, अन्य नेत्यांवर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे या घटनांमुळे महाविकास आघाडी सरकारन केंद्र सरकारवर सततच ताशेरे ओढत असते. मात्र, आता केवळ आरोप करण्याऐवजी धडक कृती मोहीम राज्यसरकारने हाती घेतली आहे.
सदावर्तेंप्रमाणे केतकी चितळेचाही होणार महाराष्ट्र दौरा; आतापर्यंत तब्बल 12 ठिकाणी गुन्हे दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर अपमानजनक आणि बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरोधात राज्यातील विविध १६ ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यापूर्वीही शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला होता. त्यावेळी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधातही अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. म्हणजेच केंद्र सरकारच्या कारवायांना रोखण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्याप्रकारे उत्तर दिलं. त्याच पावलावर पाऊल ठेवत ठाकरे सरकारने आता कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, ही कारवाई करताना त्यांना महाराष्ट्र दौऱ्याचीही संधी देण्यात येत आहे.
‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान
महाविकास आघाडी सरकारच्या किंवा नेत्यांविरोधात बोलणाऱ्यांवर एकाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत नाही, तर राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे एक गुन्ह्यातून सुटका झाली तरी दुसऱ्या ठिकाणी गुन्हे नोंद असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये त्या त्या नेत्यांना हजेरी लावावी लागत आहे. सध्या सुरु असलेले केतकी चितळे प्रकरण, गुणरत्न सदावर्ते, राणा दाम्पत्य, प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर असे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याच्या घटना दिसून येतात.
Read also:
- “महागाईमुळे सध्या आमच्या घरात लिंबू सरबत बनतच नाही”; सुप्रिया सुळे
- ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही, तिथे निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- ‘…आणि म्हणूनच धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही’; नितेश राणेंची खोचक टीका
- क्योंकी गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद है ना; स्मृती इराणीविरोधात राष्ट्रवादीचा मोठा राडा
- “शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क भाषण होतं”