मुंबई : मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात किती मराठी लोकांना रोजगार तसेच किती लोकांच्या चुली पेटवल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी तरूणांच्या हातात दगड दिल्यात, त्यांनी अनेक गुन्हे अंगावर घेतले. रमेश मोरे, जया बच्चन यांची हत्या का झाली? हे शोधून काढा. त्याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं पाहिजे. तसेच दिशा सालीयनवर अत्याचार केला, सुशांत सिंगचा जीव या सरकारने घेतला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून जागतिक स्तरावर बदनाम करणार का? नितेश राणेंचा तिखट सवाल
यांना रावणांची देखील उपमा देऊ शकत नाही. कारण रावण पराक्रमी होता. त्यामुळे यांना ना रामाची उपमा ना रावणांची उपमा देऊ शकत. शारीरीक व्यंगाबद्दल कोणताही राजकीय नेता आजपर्यंत बोलला नव्हता. पंरतु उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाबाबत बोलले त्यामुळे आपण एक आरसा घ्या आणि स्वत: कडे पाहा त्यानंतर दुसऱ्यावर टिका करा, असा घणाघात देखील त्यांनी चढवला. हे शिवसंर्पक अभियान नव्हतं. तर शिव्या संपर्क भाषण होतं. असंही ते म्हणाले.
‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान
उद्धव ठाकरे यांच्या सभेला फक्त 30 ते 40हजार लोकं होते, त्यातील आठ ते दहा हजार रस्त्यावरील फेरीवाल्या लोकांना 300 रूपये देऊन आणले होते. तो काळ गेला ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला चार ते पाच लाख लोकांची गर्दी जमायची. नाशिकच्या सभेला मी देखील हजर होतो. ते तुमच्या नशिबी नाही, हेराफेऱीकरून लोकांचा विश्वास संपादन करता येत नाही. त्यामुळे हा महाराष्ट्र शिवाजी महाराज, महात्मा फुले. राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्र उभा राहिला आहे. असंही ते म्हणाले.
“उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्याला ब्रेक लागणे कठीण”
दरम्यान, महाराजांचं नाव घेऊन कोण मुख्यमंत्री झाले आहेत ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर कुणी कसे पैसे घेतले हे पाहिलं आहे. नवाब मलिक यांना दाऊदशी संबंध दिसत असताना मंत्रिपदावरून काढलं नाही. संजय राऊत यांची संगत उद्धव ठाकरे यांंना लागली. इडीची चौकशी झाली तर ती सुडानं झाली. तुम्ही लोकांच्या घरांवर कारवाय करत ते कसल्या भावनेनं करता? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे असूनही मला मुख्यमंत्री केलं. तुम्ही १० वर्ष मुख्यमंत्री राहिलात तरी माझ्या ८ महिन्यांच्या कामाची बरोबरी करु शकणार नाही. शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क अभियान आहे, असंही ते म्हणाले.
Read also:
- “यांना रावणांची देखील उपमा देऊ शकत नाही”, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका
- ”गेल्या अडीच वर्षात NCP कडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न”; राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत नाना पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार
- “आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा”, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार
- आरोग्यमंत्र्यांनी दाखवली संवेदनशीलता; अपघातग्रस्तच्या मदतीला आले धावून; व्हिडीओ व्हायरल
- “जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार”; उद्धव ठाकरेंवर सोमय्यांनी केली बोचरी टीका