मुंबई : पावसाळा आला की, मुंबईतील नालेसफाई आणि त्यापुढच्या नियोजनाची लगबग सुरू होती. तसेच यावर्षी देखील मुंबईची तुंबई होईल का? यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असतो. यावर्षी मुंबईत 4 जून ते 3 जुलै दरम्यान सर्वात जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर बृहमुंबई महानगरपालिका मुख्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठकी देखील पार पडली. तर यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पत्र पाठवलं आहे.
केतकी चितळेला शिवीगाळ, चोपायची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करणार का? चित्रा वाघ यांचा सवाल
पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते, अशीच मुंबईची ओळख सातत्याने प्रसारमाध्यमे देतात. पंरतु या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले आहेत. तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करू शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून गतवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनतेच्या मुळ प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही त्यांनी त्या पत्रात म्हटलं आहे.
मग औरंगजेबच्या कबरीपर्यंत पोहचता यावं यासाठी का बुलेट ट्रेन? भाजप- शिवसेनेत ‘बुलेट ट्रेन वार’
पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. तुंबणाऱ्या या मुंबईत ३८६ असे धोक्याचे ठिकाणं आहेत. ज्याला आपण फ्लडींग पॉईटस म्हणतो. यापैकी २८ ठिकाण एकाच पश्चिम विभागतील आहेत. फक्त माटुंगा, वडाळा, सायन भागतच यातील २५ फ्लडींग पॉइंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला २२ दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग २५० मिली पेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय? अशी भीती व्यक्त नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
“रश्मी ठाकरे तुंरुगात जाणार”; नवनीत राणांचं सुचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा
दरम्यान, पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडींग पॉइंट्स येथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीच तोंड दयाव लागेल. या फ्लडींग पाईट्स येथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत? हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे. राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्द्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थितीत काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात.
Read also:
- ‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान
- “उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्याला ब्रेक लागणे कठीण”
- “वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया”
- जवळपास 50 वकिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट ! मशिदीवरील भोंगा प्रकरण
- दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल बोलता, मग कोणी म्याव म्याव आवाज काढला, तर वाईट का वाटलं?