मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिकडील केलेल्या सभेत मशिदीवरील भोंग्यासंबंधी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं पेटलं होतं. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात आंदोलन केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी अटक केली. तसेच यावेळी अनेकांना तुरूंगात देखील डांबले होते. या महाराष्ट्र सैनिकांना सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढणाऱ्या वकिलांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्या वकिलांचं कौतुक देखील राज ठाकरे यांनी केलं आहे.
सोशल मीडियावर भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? केतकी चितळेचा न्यायालयाला सवाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधी व जनहित विभागाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 वकिलांनी आज राज ठाकरे यांची शिवतीर्थवर भेट घेतली. मनसे नेते संदीप देशपांडे यांचं प्रकरण देखील यावेळी खुप गाजलं होतं. गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे.
“तो स्वासचं फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं”; उद्धव ठाकरेंनी काढला सोमय्यांचा चिमटा
ते पाहता मला प्रश्न पडलाय की मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकोविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसाना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उपचा डोळ्यांनी बघत आहेत. असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, अन् महाराष्ट्रवर आक्रमक होताहेत; राऊतांनी भाजपला सुनावलं
४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबल, कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे लोकांना त्रास देणारे मशिदीवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला होता.
Read also:
- दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल बोलता, मग कोणी म्याव म्याव आवाज काढला, तर वाईट का वाटलं?
- केतकी चितळेला शिवीगाळ, चोपायची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करणार का? चित्रा वाघ यांचा सवाल
- मग औरंगजेबच्या कबरीपर्यंत पोहचता यावं यासाठी का बुलेट ट्रेन? भाजप- शिवसेनेत ‘बुलेट ट्रेन वार’
- “कोदंडाचा जोरदार टणत्कार, काळ्या टोपीवाल्या मेंदुना झिणझिण्या नक्कीच आल्या असतील”
- “रश्मी ठाकरे तुंरुगात जाणार”; नवनीत राणांचं सुचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा