मुंबई : बाबरी पाडली होती तुम्ही कुठे होता ? असा सवाल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच बाबरी मिशिदीवर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी तुमच्या वजनाने बाबरी पडली असती, असं वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी काढलं. त्याचाच धागा पकडत आता भाजपनेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली आहे.
“तो स्वासचं फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं”; उद्धव ठाकरेंनी काढला सोमय्यांचा चिमटा
दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल, बोबडेपणाबद्दल भाष्य करता, मग तुमच्या मुलाच्या आवाजाबद्दल कोणी म्याव म्याव आवाज काढला. तसेच त्याच्याबद्दल काही म्हटले तर तुम्हाल वाईट का वाटतं? दुसऱ्यांची टिंगळवाळी करताना स्वत:बद्दल पण ऐकण्याची थोडी हिमंत ठेवली पाहिजे. असा सल्ला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी बाबरीवर पाय ठेवला असता तर ती पडली असती असे म्हणालेत. तर उद्धव ठाकरे तिथे उभे राहिले असते तर हवेने उडून गेले असते असं आम्ही म्हणायचे का? असा सवालही त्यांनी केला.
औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, अन् महाराष्ट्रवर आक्रमक होताहेत; राऊतांनी भाजपला सुनावलं
मुंबई तोडण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तो मर्द मराठा लचके तोडल्याशिवाय राहणार नाही. मुंबई ते अहमदाबाद जी बुलेट ट्रेन आणली जात आहे. त्याचा उपयोग काय ? असा सवाल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आरएसएसचं स्वांतत्र्य लढ्यात कुठेही दिसली नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी जो लढा सुरू होता. त्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यात देखील तुम्ही कुठे होता. ? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला होता.
अखेर केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी मानले पोलिसांचे आभार
महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यात यांचे बाप म्हणजे जनसंघ फुटला होता. त्यामुळे मुंबईचे जे काही लचके तोडण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध रहा. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे, आणि मराठी आमचा प्राण आहे. आमचे जुने फोटो तुमच्यासोबतचे व्हायरल होत आहेत. ते हिंदुत्व आम्ही आता सोडलं आहे. कारण त्याचा आता काही उपयोग नाही. गाढवासमोर वाचली गिता , कालचा गोंधळ बरा होता. असंही म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत. असंही ते म्हणालेत.
Read also:
- केतकी चितळेला शिवीगाळ, चोपायची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करणार का? चित्रा वाघ यांचा सवाल
- मग औरंगजेबच्या कबरीपर्यंत पोहचता यावं यासाठी का बुलेट ट्रेन? भाजप- शिवसेनेत ‘बुलेट ट्रेन वार’
- “कोदंडाचा जोरदार टणत्कार, काळ्या टोपीवाल्या मेंदुना झिणझिण्या नक्कीच आल्या असतील”
- “रश्मी ठाकरे तुंरुगात जाणार”; नवनीत राणांचं सुचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा
- सोशल मीडियावर भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? केतकी चितळेचा न्यायालयाला सवाल