मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मला कोणताही गुन्हा नसताना तुरूंगात टाकले. त्याची वेदना मी आजही सहन करत आहे. उद्धव ठाकरे यांची सत्ता गेल्यावर रश्मी ठाकरे यांना तुरूंगात जावे लागेल तर मी उद्धव ठाकरे यांना ‘आता तुम्हाला कसं वाटतंय’ असा प्रश्न नक्की विचारेन, हा एक दिवस नक्की येईल, असं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“आजची सभा हि शंभर सभेंचा बाप, विरोधकांच्या पोटदुखीवर आजच्या सभेत उपचार होतील”
तुमच्या घरातील स्त्री जेव्हा तुरूंगात जाईल, तेव्हा उद्धव ठाकरे यांना माझी पीडा समजेल. वेदना तुरूंगातील त्रास आणि वेदना काय असते, हे तुम्हालाही कळेल. कोणताही गुन्हा न करता तुरूंगात घालवायला लागलेल्या क्षणाक्षणाची वेदना उद्धव ठाकरे यांना त्यावेळी कळेल. एक दिवस पण नक्की येईल, असं सुचक वक्तव्य देखील नवनीत राणा यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“हिंदुत्व आमचा श्वास अन् मराठी आमचा प्राण” मुख्यमंत्र्यांचं मुंबईत जोरदार भाषण
अलिबागमधील रश्मी ठाकरे यांच्या 19 बंगल्यांचा मुद्दा भाजप नेते किरीट सोमय्यांनी लावून धरला होता. दरम्यानच्या काळात हे प्रकरण थंडावलं आहे. मात्र नवनीत राणा यांच्या वक्तव्यामुळे ते प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यात आहे. त्यामुळे भाजप या प्रकरणाबाबत पुढे कोणती भूमिका घेणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, अन् महाराष्ट्रवर आक्रमक होताहेत; राऊतांनी भाजपला सुनावलं
दरम्यान, काल मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभेपुर्वी नवनीत राणा यांनी दिल्लीत हनुमानाच्या मंदिरात महाआरती केली. त्यावेळी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टिका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेत कोणताही उत्साह नव्हता. केवळ इतरांवर टिका करण्यासाठी ही सभा होती. उद्धव ठाकरे यांना निवडणुक लढवण्याचे आवाहन दिले होते. त्यावरही ते काहीच बोलले नाहीत. बाळासाहेब ठाकरे हे कधीही सत्तेच्या खुर्चीवर बसले नाहीत. त्यांनी सत्तेबाहेर राहून शिवसेना पक्ष वाढवला, असंही त्या म्हणाल्या.
Read also:
- सोशल मीडियावर भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? केतकी चितळेचा न्यायालयाला सवाल
- “तो स्वासचं फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं”; उद्धव ठाकरेंनी काढला सोमय्यांचा चिमटा
- अखेर केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी मानले पोलिसांचे आभार
- त्यांच्यासोबत मतभेद जरूर आहेत, मात्र अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चुक, यांचा छडा लावा; राज ठाकरे
- “नवनीत राणा या आधी बारमध्ये काम करत होत्या”