मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीमध्ये भाजप आणि मनसेवर जोरदार हल्ला चढवला. काल झालेल्या गोरेगावातील नेस्को मैदानावरील हिंदी भाषा महासंकल्प सभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावरून आता अमृता फडणीस यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेत आलं असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“रश्मी ठाकरे तुंरुगात जाणार”; नवनीत राणांचं सुचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस जर बाबरी पाडण्यासाठी गेले असते तर त्यांच्या वजनानेच बाबरी पडली असती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बाबरी पाडण्याच्या वेळी माझे वजन 128 किलो होते, आणि आज 102 किलो वजन आहे. उद्धव ठाकरेंना समजावे म्हणून त्यांच्या भाषेत सांगतो. सामन्या माणसाचा एसएसआय एक असेल तर माझा 1.5 आहे आणि बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा तो 2.5 होता, अशा मिश्लि भाषेत फडणवीसांनी टोला लगावला.
सोशल मीडियावर भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? केतकी चितळेचा न्यायालयाला सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्या म्हणाल्या की, वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया. त्यामुळे आता अमृता फडणवीस यांना शिवसेना काय प्रत्युत्तर देणार त्याकडे लक्ष लागून आहे. तसेच सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर माझ्या मंत्रिमंडळातील कुण्या अनिल देशुमख किंवा नवाब मलिकची हिंमत झाली नसती. आणि ज्या दिवशी दाऊदच्या सहकार्यासोबत बसायची वेळ आली असती, त्यादिवशी सत्तेला ठोकर मारून घरी बसलो असतो. असं काल देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“तो स्वासचं फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं”; उद्धव ठाकरेंनी काढला सोमय्यांचा चिमटा
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीस संतापून म्हणाले की, राज्य चालवणं तुम्हाला आयपीएलसारखे वाटतं. त्याने तुमचे मनोरंजन होते. पण, त्या नांदेडमधील आत्महत्या केलेल्या शेतकर्यांचे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला असून तुमचे कालचे भाषण पूर्णत: सोनियांना समर्पित आहे अशीही टिका केली. तसेच आता संभाजीनगरचा विषय विसरा. कारण मुख्यमंत्री कालच म्हणाले, आता आम्ही म्हणतो तर नाव बदलण्याची गरज काय? त्यांनी पाठिंबा काढू नका म्हणून सोनियांना आश्र्वस्त केले. ते भाषण शिवसैनिकासाठी नाही, सोनियाजींना खुश करण्यासाठी होतं, असंही ते म्हणाले.
Read also:
- जवळपास 50 वकिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट ! मशिदीवरील भोंगा प्रकरण
- दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल बोलता, मग कोणी म्याव म्याव आवाज काढला, तर वाईट का वाटलं?
- केतकी चितळेला शिवीगाळ, चोपायची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करणार का? चित्रा वाघ यांचा सवाल
- मग औरंगजेबच्या कबरीपर्यंत पोहचता यावं यासाठी का बुलेट ट्रेन? भाजप- शिवसेनेत ‘बुलेट ट्रेन वार’
- “कोदंडाचा जोरदार टणत्कार, काळ्या टोपीवाल्या मेंदुना झिणझिण्या नक्कीच आल्या असतील”