मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टिकेचा फडणवीसांनी जोरदार समाचार घेतला. काल झालेल्या गोरेगावातील नेस्को मैदानावरील हिंदी भाषा महासंकल्प सभेत जोरदार प्रहार केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
“कोदंडाचा जोरदार टणत्कार, काळ्या टोपीवाल्या मेंदुना झिणझिण्या नक्कीच आल्या असतील”
उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे. असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडचे कोविड परिस्थितीबाबत एक सभा घेतली. त्यात पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलायलं लावलं होतं. मी आपलं आयपीएल मॅचसाऱखं बघत होतो. मला त्या बैठकीत बोलायचं नव्हतं. त्यावेळी त्यांनी महागाईवर एक उपाय सांगितला की, पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करा. तुम्हाला मुंबई फक्त ओरबडण्यासाठी पाहिजे आहे. असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.
“रश्मी ठाकरे तुंरुगात जाणार”; नवनीत राणांचं सुचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा
त्यावर प्रत्युत्तर म्हणून, राज्य चालवणं तुम्हाला आयपीएलसारखे वाटतं. त्याने तुमचे मनोरंजन होते. पण, त्या नांदेडमधील आत्महत्या केलेल्या शेतकर्यांचे काय? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या सभेत उपस्थित केला असून तुमचे कालचे भाषण पूर्णत: सोनियांना समर्पित आहे अशीही टिका केली. तसेच आता संभाजीनगरचा विषय विसरा. कारण मुख्यमंत्री कालच म्हणाले, आता आम्ही म्हणतो तर नाव बदलण्याची गरज काय? त्यांनी पाठिंबा काढू नका म्हणून सोनियांना आश्र्वस्त केले. ते भाषण शिवसैनिकासाठी नाही, सोनियाजींना खुश करण्यासाठी होतं, असंही ते म्हणाले.
सोशल मीडियावर भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? केतकी चितळेचा न्यायालयाला सवाल
दरम्यान, सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर माझ्या मंत्रिमंडळातील कुण्या अनिल देशुमख किंवा नवाब मलिकची हिंमत झाली नसती. आणि ज्या दिवशी दाऊदच्या सहकार्यासोबत बसायची वेळ आली असती, त्यादिवशी सत्तेला ठोकर मारून घरी बसलो असतो. असा टोला देखील फडणवीसांना लगावला.
Read also:
- “वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया”
- जवळपास 50 वकिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट ! मशिदीवरील भोंगा प्रकरण
- दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल बोलता, मग कोणी म्याव म्याव आवाज काढला, तर वाईट का वाटलं?
- केतकी चितळेला शिवीगाळ, चोपायची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करणार का? चित्रा वाघ यांचा सवाल
- मग औरंगजेबच्या कबरीपर्यंत पोहचता यावं यासाठी का बुलेट ट्रेन? भाजप- शिवसेनेत ‘बुलेट ट्रेन वार’