मुंबई : अयोध्येत बाबरी पाडली त्यावेळी मी तिथे होतो. मात्र एकही शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता, असा दावा करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली होती. तुम्ही बाबरीवर चढले असते तर तुमच्या वजनानेच ती पडली असती. त्यानंतर या मुख्यमंत्र्यांच्या टीकेला फडणवीस यांनी रविवार रोजी झालेल्या उत्तर सभेत सडेतोड उत्तर दिले.
संजू आत्या गेल्या, अन् शेवटचा दुवाही निखळला; ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले; उद्धव ठाकरे
‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही`, असा इशाराच त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला. मुंबईत झालेल्या हिंदी भाषी महासंकल्प सभेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.बाबरी मशिदीच्या मुद्यावरून फडणवीसांवर ठाकरे आणि शिवसेनेकडून होणारी टीका त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली
फडणवीस म्हणाले, मी जेव्हा म्हणालो अरे मै तो अयोध्या जा रहा था, मै तो बाबरी गिरा रहा था, मै तो मंदिर बना रहा था, तुझको मिरची लगी तो मै क्या करू? असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. अरे, हो मी बाबरी पाडायला गेलो होतो आणि मला त्याचा अभिमान आहे. १९९२ साली मी नगरसेवक झालो, त्यानंतर वकील झालो आणि ऍड. देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता. एवढेच नाही १९ व्या वर्षी काश्मीरमध्ये गेलो होता. आम्ही फाईव्ह स्टारचे राजकरण कधा केले नाही, आम्ही झोपलो प्लॅटफॉर्मवर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीत. जेव्हा जेव्हा देशाला आवश्यकता असेल तेव्हा आम्ही कारसेवक बनून जाऊ. आज माझं वजन १०२ किलो आहे त्यावेळी १२८ किलो होते, असा टोला देखील फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.
हिंदूजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?
सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल तर माझा १.५ आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझा एफएसआय २.५ होता. पण उद्धवजी तुम्हाला असं वाटतंय की माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी कराल. पण हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला पाडल्याशिवाय राहणार नाही.
लक्षात ठेवा की माननीय बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्याच मैद्याच्या पोत्याच्या पायाशी नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झाला. वजनदार लोकांच्या नादी लागू नका. उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आले, लग्न आमच्याशी केले, आमची संपत्ती घेऊन पळून गेले. मॅटर हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाचाला खाली आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Read also:
- सदावर्तेंप्रमाणे केतकी चितळेचाही होणार महाराष्ट्र दौरा; आतापर्यंत तब्बल 12 ठिकाणी गुन्हे दाखल
- “उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्याला ब्रेक लागणे कठीण”
- “वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया”
- जवळपास 50 वकिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट ! मशिदीवरील भोंगा प्रकरण
- दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल बोलता, मग कोणी म्याव म्याव आवाज काढला, तर वाईट का वाटलं? \