मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आहे. तिला येत्या 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र केतकी चितळेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत, कारण की , तिच्यावर आतापर्यंत बारा ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वकिल गुणरत्ने सदावर्ते यांच्यासारखा केतकीचा महाराष्ट्र दौरा होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मग औरंगजेबच्या कबरीपर्यंत पोहचता यावं यासाठी का बुलेट ट्रेन? भाजप- शिवसेनेत ‘बुलेट ट्रेन वार’
शरद पवारांवर वक्तव्य केल्याप्रकरणी काल राष्ट्रवादी महिला आघाडीच्या समिंद्रा बापूराव जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावर अपमानजनक आणि बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याच्या त्या म्हणाल्या. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता नुसार कलम 500,501, 505,153-A अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
“रश्मी ठाकरे तुंरुगात जाणार”; नवनीत राणांचं सुचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा
केतकी चितळेवर राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सातारा येथील केतकी चितळेवरचा बारावा गुन्हा आहे. तसेच अकोला, पवई, मुंबई, गोरेगाव-मुंबई, अमरावती, नाशिका, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, उस्मनाबाद याठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने वकिल गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर राज्यभरातून गुन्हे दाखल झाले होते. तसेच त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे केतकी चितळेला पोलीस कोठडी देण्यात येईल का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
सोशल मीडियावर भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? केतकी चितळेचा न्यायालयाला सवाल
दरम्यान, एसटी आंदोलकांना भडकवल्याप्रकणी गुणरत्ने सदावर्तेंना पोलीस कोठडी देण्यात आली होती. तब्बल 14 दिवसानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली होती. राज्यभरातून केतकी चितळेवर ज्या पद्धतीचे गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Read also:
- “उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्याला ब्रेक लागणे कठीण”
- “वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया”
- जवळपास 50 वकिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट ! मशिदीवरील भोंगा प्रकरण
- दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल बोलता, मग कोणी म्याव म्याव आवाज काढला, तर वाईट का वाटलं?
- केतकी चितळेला शिवीगाळ, चोपायची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करणार का? चित्रा वाघ यांचा सवाल