पुणे – हिंदुत्व जागृत करणे आणि हिंदुत्व पेटवणे यामध्ये शिवसेनेचा जन्मच गेला आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची पाठराखण करणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हिंदूजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण नाही, असा टोला शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मनसेला लगावला. ते आंबेगावात बोलत होते.
“संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही…”; मनसेने केली टिंगल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुढे करत मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज ठाकरे याना हिंदुजननायक म्हटले जात आहे. तसेच हिंदुत्वाची भूमिका स्वीकारून आता त्यांनी राजकारण सुरू केले आहे. ते ५ जून रोजी अयोध्येलाही जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे यांना हिंदुजननायक पदवी कोणी दिली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच ती पदवी काय कॉपीराइट नाही. त्याच्यावर कोणाची मालकी नाही, असा घणाघात शिवाजीराव आढळराव यांनी केला.
“राज ठाकरे महाराष्ट्रात राहतात, त्यांना हात लावण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही
शिवसेनेचे सर्व नेते आणि शिवसैनिक हे हिंदुत्वाच्या विचारावर चालणारे आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार कदीच सोडलेला नाही. कोणाच्या धमक्यांना किती महत्त्व द्यायचे, याला मी मानत नाही. उद्धव ठाकरे तीन वेळा अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वाचा हुंकार त्यांच्यात आहे. त्यामुळे कोणी आम्हाला धमक्या देऊ नये, असे आढळवार म्हणाले आहेत. हिंदुजननायक पदवी ढापली तर याद राखा, असा इशारा मनसे नेते योगेश खैरे यांनी शिवसेनेला दिला होता, त्याचा आढळराव यांनी समाचार घेतला आहे. ही पदवी कोणाच्या मालकीची नाही. कोणाचा कॉपीराइट नाही, असे ते म्हणाले.
Read also:
- संजू आत्या गेल्या, अन् शेवटचा दुवाही निखळला; ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले; उद्धव ठाकरे
- रामदास कदमांची लवकरच नव्या जोशात शिवसेनेत दुसरी इनिंग सुरु होणार?
- मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या
- “तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा”, ठाकरे सरकारला राम कदम यांचं खुलं आव्हान!
- राष्ट्रवादी -भाजप युतीच्या चर्चेला जोर; प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी