मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मस्लिम संघटनांकडून धमक्या येत असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. त्यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी जर राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा दिला आहे. त्यावर आता शिवसेने खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर
आपण महाराष्ट्रात राहतो हे लक्षात ठेवा. याठिकाणी कोणी कोणाला हात लावत नाही. अशी धमकीची पत्रे शिवसेना भवनात आम्हाला रोज शेकड्याने येत असतात. महाराष्ट्र सुरक्षित आहे. महाराष्ट्र कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. जर कोणाच्या केसाला धक्का लागला तर केंद्र सरकार त्यांची सीआयएसएफची सुरक्षा द्यायला समर्थ आहे. असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा पटोलेंचा इशारा
राज ठाकरे इतक्या वर्षापासून महाराष्ट्रात राहत असून ते ठाकरे आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्याला हात लावण्याची कोणाचीही हिंमत नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. ही स्टंटबाजी सोडून द्यावी. महाराष्ट्राच्या कोणत्याही नागरिकाला धोका असेल तर येथील गृहमंत्री, गुप्तचर यंत्रणा आणि सरकार त्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहेत. ते त्यांची पूर्ण रक्षा करतील असंही त्यांनी सुनावलं.
राष्ट्रवादीने सुरा खुपसला’ हा नाना पटोलेंचा आरोप चुकीचा – जयंत पाटील
दरम्यान, मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे सध्या चर्चेत आले आहेत. तसेच त्यांचा येत्या 5 जून रोजी अयोध्या दौरा आहे. मात्र तेथील भाजपच्या खासदाराने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण सध्या चांगलचं चिघळलं आहे. त्याचाच धागा पकडत संजय राऊतांनी मनसेवर निशाणा साधला आहे.
Read also:
- “संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही…”; मनसेने केली टिंगल
- “कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नका”; अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन
- भाजपने आखली रणनीती; शिवसेनेला घेरण्यासाठी आता अमित शहा येणार !
- संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार; ‘या’ संघटनेची केली मोठी घोषणा
- “टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?”, मनसेचा शिवसेनेला पुन्हा टोमणा