भंडारा/गोंदिया – भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभापतीच्या निवडणुकीत पटोले विरूद्ध पटेल असा राजकीय संघर्ष बघायला मिळाला. त्यामुळे मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काॅंग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहे. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असं ट्विट करत नाना पटोले यांनी राष्ट्रवादी विरोधात राजकीय बॉम्ब टाकला.
“आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”; भोंग्याबाबत राज ठाकरे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा
राज्यातील भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम काल रोजी पार पडला. भंडाऱ्यामध्ये अध्यक्षपदी काँग्रेसचा तर गोंदियामध्ये भाजपचा विजय झाला आहेत. मात्र यात भंडाऱ्यामध्ये काँग्रेसला मदत केली ती भाजपने आणि गोंदियामध्ये भाजपला मदत केली राष्ट्रवादी काँग्रेसने. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसनेच आघाडी धर्म गुंडाळून ठेवतं विरोधी पक्ष भाजपला साथ दिल्याचे किंवा सोबत घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आणि यामुळेच आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला.
“संदीप देशपांडे यांना पोलीस असे काही शोधत आहेत की, ते जणू पाकिस्तानातून आलेले अतिरेकी”; राज ठाकरे
बेईमानी आमच्या रक्तात नाही मात्र भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत सुरा खुपसला अशी जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःला विकास पुरुष म्हणून मिरविणाऱ्या लोकांनी जिल्ह्यातील राजकारण गलिच्छ करुन टाकले आहे, असाही आरोप त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला आहे.
“कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी अयोध्येला जाणारच”; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा इशारा
गोंदियात झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपची साथ दिली. तर भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडली असे आरोप करत पटोले यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. याशिवाय पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रकार केवळ भंडारा-गोंदियात ही नाही तर मालेगांव आणि भिवंडीतही केला असल्याच्या आरोप केला आहे. तसेच या सर्व प्रकराची माहिती व राष्ट्रवादीचे भाजपशी असलेल्या संबंधांची तक्रार दिल्लीला जावून हायकमांडला करणार असल्याचा इशाराही पटोले यांनी दिला आहे.
Read also:
- ‘राष्ट्रवादीने सुरा खुपसला’ हा नाना पटोलेंचा आरोप चुकीचा – जयंत पाटील
- जे कुटुंब प्रेमळ तिथं भांड्याला भांड लागतंच; नाना पाटोलेंच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची सारवासारव
- तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात संभाजी राजेंना प्रवेश नाकारला, अन्..;
- भाजप नेते गणेश नाईक म्हणाले, हे प्रकरण संपल्यानंतर मी..; बलात्कार प्रकरण त्यांना भोवलं
- ” केंद्र सरकारने वेळीच धडा घेतला नाही तर महागाईचा भस्मासूर उग्र रूप धारण करेल”