मुंबई : मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारला एक पत्र देखील पाठवलं आहे. त्यामुळे मशिदीवरील भोंग्यांचा विषय पुन्हा एकदा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत असते. सत्ता जात असते. त्यामुळे कुणीही सत्तेच ताम्रपट घेऊन आलेला नाही. असा इशारा दिला आहे.
“राज्यात दंगली घडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न”; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
सर्व देशबांधवांना मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारख वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबल, कशासाठी? [ध्वनिप्रदूषण करणारे लोकांना त्रास देणारे मशिदीवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी का ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा..; अयोध्या दौऱ्याआधी बृजभूषण यांचा राज ठाकरेंना कडव आव्हान
गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे. ते पाहता प्रश्न पडलाय की मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किया पोलिसांनी कधी सबवली होती का? संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत. असंही ते म्हणाले
कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार का? रिपाइंचा देवेंद्र फडणवीसांना ओबीसी आरक्षणाबाबत सवाल.
दरम्यान, महाराष्ट्र सैनिकोविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसाना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उपचा डोळ्यांनी बघत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, असंही ते म्हणाले.
Read also:
- न्यायालयाच्या निकालामुळे मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण घालवले, अशी कबुली भाजप देणार का?
- “सतत न्यायालयाची बोलणी खाणाऱ्या निरुपयोगी सरकारला जनता माफ करणार नाही”; चंद्रकांत पाटील
- “तर देशात भाजप विरोधात चळवळी उभ्या कराव्या लागतील”; शरद पवारांनी दिला ‘हा’ इशारा
- फर्मान, अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे, बृजभुषण यांना प्रत्युत्तर देणार का? राष्ट्रवादीचा सवाल
- बृजभुषण सिंह देखील राज्यपालांच्या वाटेवर; म्हणाले की, संत रामदास ना होते तो शिवराय ना होते