मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील अनेक निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशच्या निकालानंतर राज्यात ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं राज्यातील काही नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र मध्यप्रदेशचा अहवाल फेटाळत आता न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. याचाच धागा पकडत शिवसेना नेत्या मनिषा कांयदे यांनी भाजपला सवाल केला आहे.
उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा..; अयोध्या दौऱ्याआधी बृजभूषण यांचा राज ठाकरेंना कडव आव्हान
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले असा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे मध्य प्रदेशात भाजपने ओबीसी आरक्षण घालवले, अशी कबुली भाजप देणार का ? असा सवाल मनिषा कायंदे यांनी केला आहे.
कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार का? रिपाइंचा देवेंद्र फडणवीसांना ओबीसी आरक्षणाबाबत सवाल
ओबीसी आरक्षणावरून भाजपने काही दिवसापासून महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर अतिशय कठोर शब्दात राज्य सरकारव भाजपने टीका केली. त्यानंतर आता मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता ती आता फेटाळली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजून गंभीर झाला आहे. तर यावरून आता महाविकास आघाडीतील नेते भाजपवर जोरदार निशाणा साधताना दिसत आहे.
मध्य प्रदेश सरकारलाही कोर्टाचा दणका; ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होणार?
दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू असताना एमआयआरचे फोटो व्हायरल झाले होते. नवनीत राणा यांना एमआरआय कक्षात कॅमेरा- मोबाईल घेऊन जाऊ देण्यास आणि फोटो काढू देण्यास परवानगी देणे याबाबत मनिषा कांयदे बांद्रा पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे पुढील दिवसात राज्यात काय राजकीय घडामोडी घडतात ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “सतत न्यायालयाची बोलणी खाणाऱ्या निरुपयोगी सरकारला जनता माफ करणार नाही”; चंद्रकांत पाटील
- “तर देशात भाजप विरोधात चळवळी उभ्या कराव्या लागतील”; शरद पवारांनी दिला ‘हा’ इशारा
- फर्मान, अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे, बृजभुषण यांना प्रत्युत्तर देणार का? राष्ट्रवादीचा सवाल
- बृजभुषण सिंह देखील राज्यपालांच्या वाटेवर; म्हणाले की, संत रामदास ना होते तो शिवराय ना होते
- “राज्यात दंगली घडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न”; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला