मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मध्यप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळत पुढील दोन आठवड्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे महाविकास आघाडी सरकारदेखील लक्ष ठेऊन होते. त्यामुळे मध्यप्रदेश सरकारसोबत महाराष्ट्रातील सरकारलाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
“अध्यात्म आणि धर्मामध्ये कुणाचीही स्पर्धा नसते”; रोहित पवारांनी सांगितलं अयोध्या दौऱ्याचं कारण
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील अनेक निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशच्या निकालानंतर राज्यात ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं राज्यातील काही नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र मध्यप्रदेशचा अहवाल फेटाळत आता न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या आशा मावळ्या असल्याचं बोलण्यात येत आहे.
ओबीसी आरक्षणावर निर्णय दिला असल्याने पुढील होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये फक्त अनुसुचित जाती आणि जमातींना राजकीय आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा करत निवडणुक घेण्याचे अधिकार स्वत:कडे घेतले होते. त्यानुसार ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत. अशी सरकारची भूमिका होती. त्यालाही सर्वोच्च न्यायालयाने आव्हान दिले आहे.
सदावर्तेंचं थेट शरद पवारांना आव्हान ! निवडणुकीच्या रिंगणात उतरताच नव्या संघटनेची घोषणा
दरम्यान, ओबीसी आरक्षणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा टिकेचा धनी झाला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका होणार नाहीत, अशी दोन्ही बाजूच्या नेत्यांची भूमिका आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाकडे राज्य सरकार काय निर्णय घेणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.?
Read also:
- आगामी निवडणुकांसाठी आघाडीत अनेक मतप्रवाह; शरद पवारांनी सांगितला युतीबाबतचा फार्म्युला
- “समाजात वैज्ञानिक दृष्टी वाढविण्याचे काम होत असल्याचा आनंद”; शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना
- “शिरूर मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांना अधिकार नाही”; अजित पवारांनी स्पष्टचं केलं
- “गोडसेंनी सांगितलं की, गांधींनी शेवटच्या वेळी ‘हे राम’ म्हटलं नाही”; सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
- “अखेर सेनेची मंडळी आली पण कर्मचाऱ्यांसाठी नाही तर राणांसाठी”; भाजपची शिवसेनेवर जहरी टीका