पुणे : सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील, असा एल्गार खासदार संजय राऊत यांनी शिरुरमध्ये जाऊन केला. आढळरावांचं शिवसेनेसाठीचं काम मोठं आहे. त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, असंही राऊत म्हणाले. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
मोठी बातमी: राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाची नोटीस; जामीन रद्द होणार?
संजय राऊतांना प्रत्युत्तर देत अजित पवार म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदार संघाबाबत संजय राऊत बोलले असतील, तर ते कार्यकर्त्यांना बंर वाटण्यासाठी बोलले असतील. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. तो त्यांचा अधिकार आहे. असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
राणांच्या एमआरआयच्या फोटोवरून सेनेचा रूग्णालयात राडा; किशोरी पेडणेकर, कायंदेंचा लीलावतीमध्ये ठिय्या
आगामी लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार हे कोरेगाव मतदार संघातून निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले की, पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणुक लढविणार हे धांदात खोटे आहे. माध्यमांनीही खुप महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. अतिरंजित बातम्यांना प्राधान्य न देता समाजात शांतता, जातीय सलोखा राहील आणि समाजात तेढ निर्माण होणार नाही यासाठी माध्यमांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेवटी माध्यमांची विश्वासार्हताही महत्वाची आहे. असंही ते म्हणाले.
संजय राऊत यांचे ‘टॉयलेट’ घोटाळा प्रकरण; किरीट सोमय्या यांच्या पत्नीची अब्रुनुकसानीची तक्रार
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आणि संजय राऊत यांनी यापूर्वीच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिरुर मतदार संघावर शिवसेनेने दावा केल्यास आघाडीत बिघाडीची शक्यता आहे. डॉ. कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर समझोत्याची सूतराम शक्यता नाही. मात्र, सध्यस्थितीला बदललेले राजकारण पाहता महाविकास आघाडीच्या साठमारीत शिरुरची जागा शिवसेना सोडल्यास डॉ. कोल्हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.
Read also:
- “गोडसेंनी सांगितलं की, गांधींनी शेवटच्या वेळी ‘हे राम’ म्हटलं नाही”; सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
- “अखेर सेनेची मंडळी आली पण कर्मचाऱ्यांसाठी नाही तर राणांसाठी”; भाजपची शिवसेनेवर जहरी टीका
- “अध्यात्म आणि धर्मामध्ये कुणाचीही स्पर्धा नसते”; रोहित पवारांनी सांगितलं अयोध्या दौऱ्याचं कारण
- “त्यांच्या पाठीवर दांडके मारवे लागतील, तरच ते विकासाची सत्य भाषा बोलू लागतील”; खोतांचा आघाडीवर घणाघात
- सदावर्तेंचं थेट शरद पवारांना आव्हान ! निवडणुकीच्या रिंगणात उतरताच नव्या संघटनेची घोषणा