मुंबई : राज्यातील एसटी महामंडळाची बॅंक ही सहकाराची बॅंक असून ती एक स्टेट आहे. ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून देण्याची प्रक्रिया आहे. ती कोणाच्या बापाच्या घरची व्यवस्था नाही. कोणाला इथं भ्रष्टाचारासाठी मोकळीक दिलेली नाही. त्यामुळे कष्टकरी एसटी कर्मचारी आपली स्वत: ची माणसं निवडतील. असं म्हणत वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे.
राणांच्या एमआरआयच्या फोटोवरून सेनेचा रूग्णालयात राडा; किशोरी पेडणेकर, कायंदेंचा लीलावतीमध्ये ठिय्या
गुणरत्ने सदावर्ते यांनी मुंबईत त्यांच्या नव्या संघटनेची घोषणा केली आहे. एसटी कष्टकरी जनसंघ कार्यरत असणार असून एसटीच्या बॅंकेचं पॅनल ही संघटना लढवणार आहे. असंही ते म्हणाले. अनेक वर्षापासून एसटी महामंडळाची बॅंकेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचं वर्चस्व होतं. त्यामुळे आपलं पॅनल उभं करत आणि त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना उमेदवाऱ्या देऊन सदावर्ते थेट शरद पवार यांना आव्हान देणार आहेत.
संजय राऊत यांचे ‘टॉयलेट’ घोटाळा प्रकरण; किरीट सोमय्या यांच्या पत्नीची अब्रुनुकसानीची तक्रार
गेल्या 70 वर्षात कष्टकऱ्यांसाठी काम झालं नाही. कर्मचाऱ्यांची टिंगल केली जात आहे. गिरणी कामगार होईल, असं म्हटलं गेलं पण कोर्टाने निर्णय दिला. त्यामुळे आता प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने नव्या संकल्पना आहेत. पाच लाख महाराष्ट्रातले कष्टकरी सोबत घेणार आहेत. तसेच आतापर्यंत राजकीय पक्षाच्या आधारावरील कर्मचारी संघटना आहेत. असंही ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी नथुरामजी गोडसे यांनी सांगितलं की महात्मा गांधी यांनी शेवटच्या वेळी हे राम असं म्हटलं नव्हतं. आपल्याला इतिहास चुकीचा शिकवला गेला असल्याचं वक्तव्य गुणरत्ने सदावर्ते यांनी केलं आहे.
संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप; म्हणाले, किरीट का कमाल.. आप क्रोनोलॉजी समजीए!
दरम्यान, ते पुढे बोलताना म्हणाले की, आतापर्यंत या बॅंकेवर पॉलिटिकल बॉस उभे केले जात होते. ही बुजगावणी एसटी कर्मचाऱ्यांना 14 ते 15 टक्के व्याजानं कर्ज द्यायचे, यातून त्यांचं प्रचंड शोषण होत होतं. इतर राज्यांसाठी मात्र 7 ते 8 टक्के व्याजदर दिला जातो. आमची बॅंक, आमचा पैसा, आमचे कष्ट, आमचे श्रम आणि पैसा असतानाही या राजकारण्यांकडून आपल्या मर्जितल्या लोकांना आणि इतर राज्यांना कर्जे दिलीत . आमचं म्हणणं आहे की तिकडं सात टक्के देता तर इतं का नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
Read also:
- “अखेर सेनेची मंडळी आली पण कर्मचाऱ्यांसाठी नाही तर राणांसाठी”; भाजपची शिवसेनेवर जहरी टीका
- “अध्यात्म आणि धर्मामध्ये कुणाचीही स्पर्धा नसते”; रोहित पवारांनी सांगितलं अयोध्या दौऱ्याचं कारण
- “त्यांच्या पाठीवर दांडके मारवे लागतील, तरच ते विकासाची सत्य भाषा बोलू लागतील”; खोतांचा आघाडीवर घणाघात
- सदावर्तेंचं थेट शरद पवारांना आव्हान ! निवडणुकीच्या रिंगणात उतरताच नव्या संघटनेची घोषणा
- मोठी बातमी: राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाची नोटीस; जामीन रद्द होणार?