पुणे : आगामी काळात महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राज्यातील राजकीय पक्ष मोर्चाबांधणी करताना दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काॅंग्रेस पक्ष अजूनही स्थिर आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्रित लढणार की स्वबळावर लढाणार याबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वपुर्ण भाष्य केलं आहे.
आगामी काळातील निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या, याबाबत अद्याप महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत आमची चर्चा झालेली नाही. मात्र पक्षांतर्गत आम्ही याबाबत बैठक घेतली. या बैठकीत मतप्रवाह समोर आले आहेत. सर्वांनी स्वतंत्रपणे निवडणुक लढवावी आणि निवडणुक झाल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र बसावं, असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर काही लोकांनी मागणी केली आहे की, सरकारमध्ये आपण एकत्र असल्याने ही निवडणुकही आघाडी म्हणूनच लढवावी, असं मत शरद पवारांनी मांडलं आहे.
सदावर्तेंचं थेट शरद पवारांना आव्हान ! निवडणुकीच्या रिंगणात उतरताच नव्या संघटनेची घोषणा
खासदार संभाजी राजें यांचा राज्यसभा खासदाराचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवण्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र मी स्वत: राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत महाराष्ट्राचे काही प्रश्न आले तर आम्ही स्वत: चा पक्ष बाजूला ठेवून एकत्र यावं असं आवाहन करतो. तेव्हा आम्हाला संभाजीराजेंचं नेहमीच सरकार्य लाभलं आहे.
मोठी बातमी: राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाची नोटीस; जामीन रद्द होणार?
दरम्यान, मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या प्रमुख शहारांसह राज्यात एकुण 18 महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे सध्या राज्यात त्या दृष्टीने राजकीय पक्ष हालचाली करताना दिसत आहे. या निवडणुकांसाठी राज्यात भाजप-मनसे युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यावर भाजपच्या मोठ्या नेत्यांनी अजूनही स्पष्ट भूमिका घेतली नाही. तर महाविकास आघाडीमध्ये देखील चलबिचल सुरू आहे.
Read also:
- “समाजात वैज्ञानिक दृष्टी वाढविण्याचे काम होत असल्याचा आनंद”; शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना
- “शिरूर मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांना अधिकार नाही”; अजित पवारांनी स्पष्टचं केलं
- “गोडसेंनी सांगितलं की, गांधींनी शेवटच्या वेळी ‘हे राम’ म्हटलं नाही”; सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
- “अखेर सेनेची मंडळी आली पण कर्मचाऱ्यांसाठी नाही तर राणांसाठी”; भाजपची शिवसेनेवर जहरी टीका
- “अध्यात्म आणि धर्मामध्ये कुणाचीही स्पर्धा नसते”; रोहित पवारांनी सांगितलं अयोध्या दौऱ्याचं कारण