सांगली : राज्यातील अलिकडील राजकीय वातावरण विविध मुद्दयावरून चांगलचं तापलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भोंग्यासंबंधी भूमिकेमुळे राजकारण चिघळलं होतं. त्यावर राज्यातील राजकीय नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
“शिरूर मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांना अधिकार नाही”; अजित पवारांनी स्पष्टचं केलं
आपण पुन्हा निवडून येणार नाही अशी भीती असते, तेव्हाच असे वातावरण तयार केले जाते. धर्मात तेढ निर्माण केला जातो. महाविकास आघाडी सरकार पडावे यासाठी सर्व प्रयत्न झाले. मात्र यश न आल्याने राज्यात दंगली व्हाव्यात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही लोकं प्रयत्न करत आहे. यांच्या डावात आपल्याला फसायचे नाही. आपल्या राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो यासाठी आपण सर्वच प्रयत्न करूयात आणि आपला सामाजिक एकोपा जपूयात. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“गोडसेंनी सांगितलं की, गांधींनी शेवटच्या वेळी ‘हे राम’ म्हटलं नाही”; सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
राष्ट्रवादीचा उरूण- इस्लामपुर शहरातील ईदगाह व शादीखाना कामाचा शुभारंभ सोहळा आज पार पडला. त्यावेळी अल्पसंख्यांक मंत्री जितेंद्र आव्हाड आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला. अतिशय देखणी आणि उपयुक्त वास्तू उभाऱण्याचे काम येत्या काळात आपल्याला करायचे आहे. असंही जयंत पाटील यांनी उपस्थितीत कार्यकर्त्यांना सांगितलं.
“अखेर सेनेची मंडळी आली पण कर्मचाऱ्यांसाठी नाही तर राणांसाठी”; भाजपची शिवसेनेवर जहरी टीका
दरम्यान, मुस्लिम बांधवांनी प्रगती करावी यासाठी आमचा सर्वांचाच कायम प्रयत्न राहिला आहे. या समाजातील लोक शैक्षणिक क्षेत्रातही पुढे जावे यासाठी आम्ही काम करत आहोत. त्यामुळे येत्या काळात या भागातील उर्दू माध्यामिक शाळेचाही विकास करणार आहोत. असही आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं आहे.
Read also:
- उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा..; अयोध्या दौऱ्याआधी बृजभूषण यांचा राज ठाकरेंना कडव आव्हान
- कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार का? रिपाइंचा देवेंद्र फडणवीसांना ओबीसी आरक्षणाबाबत सवाल
- मध्य प्रदेश सरकारलाही कोर्टाचा दणका; ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होणार?
- आगामी निवडणुकांसाठी आघाडीत अनेक मतप्रवाह; शरद पवारांनी सांगितला युतीबाबतचा फार्म्युला
- “समाजात वैज्ञानिक दृष्टी वाढविण्याचे काम होत असल्याचा आनंद”; शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना