मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मध्यप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळत पुढील दोन आठवड्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे महाविकास आघाडी सरकारदेखील लक्ष ठेऊन होते. त्यामुळे मध्यप्रदेश सरकारसोबत महाराष्ट्रातील सरकारलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“अखेर सेनेची मंडळी आली पण कर्मचाऱ्यांसाठी नाही तर राणांसाठी”; भाजपची शिवसेनेवर जहरी टीका
मंडल आयोग आणि ओबीसी आरक्षबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारवर जोरदार टिका करताना दिसत होते. मध्य प्रदेश सरकारची ओबीसी आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता मध्य प्रदेश सरकारविरोधात बरखास्त करण्याची मागणी करणार का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.
“अध्यात्म आणि धर्मामध्ये कुणाचीही स्पर्धा नसते”; रोहित पवारांनी सांगितलं अयोध्या दौऱ्याचं कारण
ओबीसी आरक्षणासंदर्भात कायदा करण्याची मागणी तुम्ही केंद्र सरकारकडे करणार का? असा सवालही त्यांनी केला आहे. जर तुमच्याकडून काही होणार नसेल तर तुम्हाला ओबीसी आरक्षणाबाबत बोलण्याचा काहीही अधिकार नाही असंही ते म्हणाले.
दरम्यान, ओबीसी आरक्षणावर निर्णय दिला असल्याने पुढील होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये फक्त अनुसुचित जाती आणि जमातींना राजकीय आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा करत निवडणुक घेण्याचे अधिकार स्वत:कडे घेतले होते. त्यानुसार ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत. अशी सरकारची भूमिका होती. त्यालाही सर्वोच्च न्यायालयाने आव्हान दिले आहे.
Read also:
- मध्य प्रदेश सरकारलाही कोर्टाचा दणका; ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होणार?
- आगामी निवडणुकांसाठी आघाडीत अनेक मतप्रवाह; शरद पवारांनी सांगितला युतीबाबतचा फार्म्युला
- “समाजात वैज्ञानिक दृष्टी वाढविण्याचे काम होत असल्याचा आनंद”; शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना
- “शिरूर मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांना अधिकार नाही”; अजित पवारांनी स्पष्टचं केलं
- “गोडसेंनी सांगितलं की, गांधींनी शेवटच्या वेळी ‘हे राम’ म्हटलं नाही”; सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य