पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याआधी उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार बृजभूषण यांनी राज ठाकरे यांना कडवं आव्हान दिलं आहे. जो पर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही. तोपर्यंत राज ठाकरेंना अयोध्यात येऊ देणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. आज त्यासंदर्भात उत्तर प्रदेशमध्ये बैठक ही पार पडली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली देखील काढली.
“गोडसेंनी सांगितलं की, गांधींनी शेवटच्या वेळी ‘हे राम’ म्हटलं नाही”; सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर केलेला अत्याचार आम्ही विसरणार नाही. साधूसंतांनी राज ठाकरे यांना माफ केलं तरच राज ठाकरे अयोध्यात प्रवेश करतील. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. साधूसंत आणि अयोध्यावासी राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
“अखेर सेनेची मंडळी आली पण कर्मचाऱ्यांसाठी नाही तर राणांसाठी”; भाजपची शिवसेनेवर जहरी टीका
आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि नंतर अचानक राम भक्त बनायचं. हे जनतेच्याही लक्षात येत आहे. अयोध्यातील जनता राज ठाकरेंवर नाराज आहे. साधूसंतांनी राज ठाकरेंवर रोष व्यक्त केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय आणि मध्य भारतीय लोकांमध्ये भांडण लावण्याचं काम केलं आहे आणि आज अचानक त्यांचं ह्यदय परिवर्तन झालं आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही अटीशिवाय माफी मागावी. त्यामुळे राज ठाकरे यांचा विरोध कायम राहणार असंही ते म्हणाले.
“अध्यात्म आणि धर्मामध्ये कुणाचीही स्पर्धा नसते”; रोहित पवारांनी सांगितलं अयोध्या दौऱ्याचं कारण
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील राजकीय नेत्यांना हिंदुत्वाचा वायरस चढला आहे. राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर शिवसेनेने देखील अयोध्या दौऱ्याबाबत घोषणा केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे येत्या 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचंही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्याआधी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील अयोध्या दौरा केला.
Read also:
- कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार का? रिपाइंचा देवेंद्र फडणवीसांना ओबीसी आरक्षणाबाबत सवाल
- मध्य प्रदेश सरकारलाही कोर्टाचा दणका; ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होणार?
- आगामी निवडणुकांसाठी आघाडीत अनेक मतप्रवाह; शरद पवारांनी सांगितला युतीबाबतचा फार्म्युला
- “समाजात वैज्ञानिक दृष्टी वाढविण्याचे काम होत असल्याचा आनंद”; शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना
- “शिरूर मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांना अधिकार नाही”; अजित पवारांनी स्पष्टचं केलं