पुणे : दिवसेंदिवस देशात प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किमती कुठे जाऊन पोहचल्या आहेत. स्टीलचे भाव वाढले आहेत. इंधन दर वाढल्याने प्रत्येक गोष्टीचे भाव वाढतात. या सगळ्याची झळ ही सामान्य माणसाला सहन करावी लागते. याचा स्पष्ट अर्थ हाच आहे की ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत त्या लोकांना मूलभूत प्रश्न सोडवता येत नाहीत. त्यात केंद्रीय सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी धर्मांध विचाराला प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली जात आहे. असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केलं आहे.
मध्य प्रदेश सरकारलाही कोर्टाचा दणका; ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होणार?
आज कोल्हापूरमध्ये विविध विषयांवर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आता सुप्रीम कोर्टाने ज्या परिस्थितीत निवडणूक थांबवली तिथून निवडणुका सुरू करा असा निर्णय दिला आहे. देशाची सूत्र ज्यांच्याकडे आहेत ते याकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. लोकांकडून यासाठी चळवळी होतील, त्या चळवळी कराव्याही लागतील असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
आगामी निवडणुकांसाठी आघाडीत अनेक मतप्रवाह; शरद पवारांनी सांगितला युतीबाबतचा फार्म्युला
आताच्या केंद्रातील सरकारने जनतेला महागाई, बेरोजगारी हटविण्याची आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यात त्यांना शंभर टक्के अपयश आले आहे. याची किंमत लोक केंद्र सरकारकडून योग्य वेळी वसूल करतील, असंही ते म्हणाले.
“समाजात वैज्ञानिक दृष्टी वाढविण्याचे काम होत असल्याचा आनंद”; शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना
दरम्यान, आगामी काळातील निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या, याबाबत अद्याप महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत आमची चर्चा झालेली नाही. मात्र पक्षांतर्गत आम्ही याबाबत बैठक घेतली. या बैठकीत मतप्रवाह समोर आले आहेत. सर्वांनी स्वतंत्रपणे निवडणुक लढवावी आणि निवडणुक झाल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र बसावं, असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर काही लोकांनी मागणी केली आहे की, सरकारमध्ये आपण एकत्र असल्याने ही निवडणुकही आघाडी म्हणूनच लढवावी, असं मत शरद पवारांनी मांडलं आहे.
Read also:
- फर्मान, अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे, बृजभुषण यांना प्रत्युत्तर देणार का? राष्ट्रवादीचा सवाल
- बृजभुषण सिंह देखील राज्यपालांच्या वाटेवर; म्हणाले की, संत रामदास ना होते तो शिवराय ना होते
- “राज्यात दंगली घडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न”; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा..; अयोध्या दौऱ्याआधी बृजभूषण यांचा राज ठाकरेंना कडव आव्हान
- कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार का? रिपाइंचा देवेंद्र फडणवीसांना ओबीसी आरक्षणाबाबत सवाल