मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जुन रोजी अयोध्या दौरा होणार आहे. परंतु त्या आधी उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांना कडवं आव्हान दिलं आहे. उत्तर भारतीयांची जोपर्यंत माफी मागत नाही. तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्यात पाऊल ठेऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या विरोधात आज रॅली देखील काढली. त्या रॅलीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
“समाजात वैज्ञानिक दृष्टी वाढविण्याचे काम होत असल्याचा आनंद”; शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना
अलिकडेच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नात्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यावेळी राज्यात बराच मोठा राजकीय वाद उफळून आला होता. राज्यपालांच्या पावलांवर पाऊल ठेऊन बृजभुषण सिंह यांनी देखील वादग्रस्त केलं आहे. संत रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराज नसते असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
“शिरूर मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांना अधिकार नाही”; अजित पवारांनी स्पष्टचं केलं
त्यांनी रॅलीत असं म्हटलं होतं. की, द्रोणचार्य होते तो, अर्जून ना होते. परशूराम ना होते, तो द्रोणाचार्य ना होते, संत रामदास ना होते तो शिवाजी ना होते. असं विधान करत त्यांनी महाराष्ट्राती जुना वाद पुन्हा बाहेर काढला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता राज्यातील राजकीय नेते जोरदार टिकास्त्र सोडण्याची शक्यता आहे.
“गोडसेंनी सांगितलं की, गांधींनी शेवटच्या वेळी ‘हे राम’ म्हटलं नाही”; सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
दरम्यान, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर केलेला अत्याचार आम्ही विसरणार नाही. साधूसंतांनी राज ठाकरे यांना माफ केलं तरच राज ठाकरे अयोध्यात प्रवेश करतील. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. साधूसंत आणि अयोध्यावासी राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “राज्यात दंगली घडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न”; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा..; अयोध्या दौऱ्याआधी बृजभूषण यांचा राज ठाकरेंना कडव आव्हान
- कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार का? रिपाइंचा देवेंद्र फडणवीसांना ओबीसी आरक्षणाबाबत सवाल
- मध्य प्रदेश सरकारलाही कोर्टाचा दणका; ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होणार?
- आगामी निवडणुकांसाठी आघाडीत अनेक मतप्रवाह; शरद पवारांनी सांगितला युतीबाबतचा फार्म्युला