मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मध्यप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळत पुढील दोन आठवड्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे महाविकास आघाडी सरकारदेखील लक्ष ठेऊन होते. त्यामुळे मध्यप्रदेश सरकारसोबत महाराष्ट्रातील सरकारलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार का? रिपाइंचा देवेंद्र फडणवीसांना ओबीसी आरक्षणाबाबत सवाल
ते म्हणाले की, लोकोपयोगी योजना बंद करणे, विकास कामांमध्ये स्थगिती आणणे आणि आपला मनमानी कारभार चालवणे हाच उद्योग या मविआ सरकारने सुरू ठेवला आहे. ज्या आमदार दत्तक ग्राम योजनेमुळे गावखेड्यांमधील नागरिकांचं भलं होत होतं, सर्वांगिण विकासकामांसाठी निधी मिळत होता, ते या सरकारला पाहावलं नाही. तसेच वसुली करून यांचे कित्येक मंत्री तुरुंगात गेले. जलयुक्त शिवार योजनेवरून या सरकारवर ताशेरे ओढले गेले, मात्र तरीही जनतेची पिळवणूक करण्याचा त्यांचा हा अहंकार कमी झाला नाही. सतत न्यायालयाची बोलणी खाणाऱ्या या निर्लज्य, निरुपयोगी सरकारला जनता कधीही माफ करणार नाही.
मध्य प्रदेश सरकारलाही कोर्टाचा दणका; ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होणार?
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील अनेक निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशच्या निकालानंतर राज्यात ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं राज्यातील काही नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र मध्यप्रदेशचा अहवाल फेटाळत आता न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या आशा मावळ्या असल्याचं बोलण्यात येत आहे.
आगामी निवडणुकांसाठी आघाडीत अनेक मतप्रवाह; शरद पवारांनी सांगितला युतीबाबतचा फार्म्युला
दरम्यान, ओबीसी आरक्षणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा टिकेचा धनी झाला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका होणार नाहीत, अशी दोन्ही बाजूच्या नेत्यांची भूमिका आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाकडे राज्य सरकार काय निर्णय घेणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.?
Read also:
- “तर देशात भाजप विरोधात चळवळी उभ्या कराव्या लागतील”; शरद पवारांनी दिला ‘हा’ इशारा
- फर्मान, अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे, बृजभुषण यांना प्रत्युत्तर देणार का? राष्ट्रवादीचा सवाल
- बृजभुषण सिंह देखील राज्यपालांच्या वाटेवर; म्हणाले की, संत रामदास ना होते तो शिवराय ना होते
- “राज्यात दंगली घडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न”; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा..; अयोध्या दौऱ्याआधी बृजभूषण यांचा राज ठाकरेंना कडव आव्हान