मुंबई – गोंदिया जिल्हा परिषदेतील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीने युती करत काँग्रेसला सत्तेतून खाली खेचले. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठित खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. त्यावरुन आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. पटोले यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
ओबीसी मोर्चाने महाविकास आघाडी सरकारचा ओबीसी आरक्षणाबाबतचा खोटेपणा उघड केला
जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीला ‘डिस्टर्ब’ करण्याचा राष्ट्रवादीने कधीही प्रयत्न केला नाही किंवा एकला चलो ची भूमिकाही घेतलेली नाही. तिन्ही पक्ष एकत्र रहावेत हीच राष्ट्रवादीची आधीपासूनची भूमिका आहे. प्रफुल्ल पटेल हे परदेशात असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. कोणत्या परिस्थितीत गोंदिया जिल्हापरिषदेबाबत निर्णय झाला हे तपासल्यानंतरच बोलणे योग्य होईल, असे पाटील यांनी सांगितले.
सरकारी भाडेतत्वावरील भूखंडावर मालकी हक्क; माविआ सरकारचा ३ हजार कोटींचा घोटाळा
नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर केलेला आरोप आरोप चुकीचा आहे. राज्यात येणार्या काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. स्थानिक नेतृत्वाने सर्वांना एकत्रित चर्चा करून महाविकास आघाडी एकत्र रहावी, असे प्रयत्न करणे अपेक्षित होते. गोंदियामध्ये नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे काही वेगळे प्रयोग झाले असेल तर त्याची नोंद पक्ष घेईल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
Read also:
- जे कुटुंब प्रेमळ तिथं भांड्याला भांड लागतंच; नाना पाटोलेंच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची सारवासारव
- तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात संभाजी राजेंना प्रवेश नाकारला, अन्..;
- भाजप नेते गणेश नाईक म्हणाले, हे प्रकरण संपल्यानंतर मी..; बलात्कार प्रकरण त्यांना भोवलं
- ” केंद्र सरकारने वेळीच धडा घेतला नाही तर महागाईचा भस्मासूर उग्र रूप धारण करेल”
- “माणसं जमा करायला शिवसेनेला राज ठाकरेंचा आधार घ्यावा लागतो का?”; शिवसेनेच्या टिझरमध्ये राज यांच्या सभेतील दृश्य