मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुंबईतील सत्र न्यायालयात कारवाई सुरू होती. गणेश नाईक यांनी देखील जामीन अर्जासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. गेला. त्यानंतर पहिल्यांदाचं त्यांनी याप्रकरणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“राजद्रोहाच्या कलमाचा फेरविचार झाला पाहिजे, नाहीतर रद्द करायला हवा”; जितेंद्र आव्हांडाची प्रतिक्रिया
बुधवारी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या प्रकरणासंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, माझ्यावर दाखल झालेले गुन्हे हे विरोधी पक्षाचे षडयंत्र आहे. याबाबत आपण लवकरच सविस्तर बोलणार असून दुध का दुध आणि पानी का पानी करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांना मुस्लिम संघटनांकडून धमक्या; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट घेणार
मागील 25 वर्षात ज्यांना राजकारणात, समाजकारणात उदिष्ट साध्य करता आले नाही. त्यांनी अन्यायकारक पद्धतीने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. उच्च न्यायालयाने मला दिलासा दिला आहे. मोकळीक देताना न्यायालायने काही बंधनं घातली आहे. त्यामुळे गरज लागेल त्या स्तरावर योग्य पद्धतीने मी समोर जाणार आहे. हे प्रकरण संपल्यानंतर मी सगळ्यांशी संवाद साधणार आहे. असंही ते म्हणाले.
मोदीजी, आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है, तो धान, रोटी लगती है; सुप्रियाताई सुळे
दरम्यान, एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर गु्न्हा दाखल केला. नेरूळ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याचे या महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्यावर केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.
Read also:
- ” केंद्र सरकारने वेळीच धडा घेतला नाही तर महागाईचा भस्मासूर उग्र रूप धारण करेल”
- “माणसं जमा करायला शिवसेनेला राज ठाकरेंचा आधार घ्यावा लागतो का?”; शिवसेनेच्या टिझरमध्ये राज यांच्या सभेतील दृश्य
- राजद्रोहाच्या कलमामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे; छगन भुजबळ
- राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल! मनसे आक्रमक
- राणा दाम्पत्य मुंबई मनपा निवडणुकीत उतरणार; उद्धव ठाकरे CM झाल्यापासून राज्याची दुर्दशा