मुंबई : देशात एव्हाना राज्यात मागील काही दिवसापासून राजद्रोहाच्या कलमाचा मुद्दा गाजला आहे. त्यामुळे या कलमाची चर्चा सध्या सर्वत्र आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात या कायद्याविषयी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने राजद्रोह कलमावर अंतरिम आदेश दिला आहे. त्यामुळे जवळपास 152 वर्षाच्या या कलमाला न्यायालयात स्थगिती दिली आहे.
“तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं”
राजद्रोहाच्या कमलाखाली झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल यांनी बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे की, गुन्हेगारी अपराध दाखल करण्यापासून अडवले जाऊ शकत नाही. याचा विचार करूनच केंद्र सरकार एक नियमावली जारी करू शकते. त्यासाठी एक मसूदाही तयार केला आहे. या प्रकारचे अपराधांवर सरकार या न्यायालयाकडून स्थगिती देणे अयोग्य ठरू शकतो. त्यासाठी एका जबाबदार अधिकाऱ्याकड़ून या गुन्हांची चौकशी करू शकतो.
राजद्रोहाचा कलम रद्द करावा. यावर न्यायाधीशांनी आज आपण राजद्रोहाचा कायदा रद्द करू शकतो का ? असा सवाल करताच कपिल सिब्बल यांनी राजद्रोहाच्या कायद्यावर प्रतिबंध लावा असंही त्यांनी म्हटलं आहे. यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी अयोध्येला जाणारच”; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा इशारा
ते म्हणाले की, भारतातील ब्रिटीश राजवटीमध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर ज्यांनी ब्रिटीशां विरोधात आवाज उचलला त्यांच्यावरती कलम 124-A अन्वये राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात येत होता. आजही आपण त्याच कलमान्वये गुन्हा दाखल करणार असू तर ह्या कलमाचा फेरविचार व्हायला हवा नव्हे तर तो रद्दच व्हायला हवा. असं त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- राज ठाकरे यांना मुस्लिम संघटनांकडून धमक्या; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट घेणार
- मोदीजी, आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है, तो धान, रोटी लगती है; सुप्रियाताई सुळे
- मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादीने काॅंग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसला; नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- किरीट सोमय्यांनी एका शिपायाकडून लाखो रूपये उकळले; राऊतांचा सोमय्यांवर राजकीय प्रहार
- भाजपमध्ये बंडखोरी करताच चंद्रकांत पाटलांनी माजी आमदाराला केलं 6 वर्ष निलंबित; काॅंग्रेसला फायदा झाल्याचा राग साहेब..पत्रास कारण की, जीव गेलाय,’पाणीटंचाईने’ पाच निष्पंपाचा! एकनाथ शिंदेंना काळीज पिळवटून टाकणारं पत्र