मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील राजकीय संघर्ष आता कुठे तरी थांबला होता. तो पुन्हा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांविरोधात नवा आरोप केला आहे.एनएसइएल घोटाळ्यात नाव आल्यानंतर मोतीलाल ओसवाल या स्टॉक ब्रोकिंग आणि वित्तविषयक सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून भाजपनेते किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो रूपयांची देणगी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात आज सकाळा ट्विट केलं आहे.
“आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”; भोंग्याबाबत राज ठाकरे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा
सुरूवातीला एनएसइएल मध्ये 5600 कोटी शेअर्स घोटाळ्याची चौकशी किरीट सोमय्यांनी केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी आयकर विभागाने चौकशी देखील केली होती. त्यानंतर किरीट सोमय्यांनी स्वत ; साठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला आणि 2018-19 असे दोन वर्ष सोमय्या ने मोतीलाल ओसवाल कडून लाखो रूपये त्याच्या युवक प्रतिष्ठान साठी घेतले असा आरोप राऊतांनी केला आहे.
न्यायालयाच्या निकालामुळे मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण घालवले, अशी कबुली भाजप देणार का?
त्याआधीही संजय राऊतांनी सोमय्यांविरोधात ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, किरीट का कमाल..! वर्ष 2013-14 मध्ये किरीट सोमय्या यांनी एका कंपनीविरोधात आरोप केला होता. त्यानंतर त्या कंपनीच्या प्रमुखाची चौकशी झाली. त्यानंतर 2018-19 मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. क्रोनोलॉजी समजीए असं म्हणत त्यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे.
“सतत न्यायालयाची बोलणी खाणाऱ्या निरुपयोगी सरकारला जनता माफ करणार नाही”; चंद्रकांत पाटील
दरम्यान, संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये मागील काही महिन्यामध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळाला. किरीट सोमय्यांनी संजय राऊतांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लावताच राऊतांनी देखील सोमय्यांविरोधात बाण सोडण्यास सुरूवात केली. आयएनएस विक्रांत प्रकरण, तसेच असे अनेक आरोपांवरून संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. अलिकडचे यांच्यातील हा राजकीय संघर्ष क्षमलेला असताना पुन्हा एकदा तो बाहेर आला आहे.
Read also:
- भाजपमध्ये बंडखोरी करताच चंद्रकांत पाटलांनी माजी आमदाराला केलं 6 वर्ष निलंबित; काॅंग्रेसला फायदा झाल्याचा राग
- “तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं”
- साहेब..पत्रास कारण की, जीव गेलाय,’पाणीटंचाईने’ पाच निष्पंपाचा! एकनाथ शिंदेंना काळीज पिळवटून टाकणारं पत्र
- “कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी अयोध्येला जाणारच”; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा इशारा
- “संदीप देशपांडे यांना पोलीस असे काही शोधत आहेत की, ते जणू पाकिस्तानातून आलेले अतिरेकी”; राज ठाकरे