ठाणे : राज्यातील राजकारणी नेते सध्या एकमेकांवर चिखलफेक करण्यात मश्गुल आहेत. पंरतु राज्यात महागाईने वाढलेला भोंगा अन् पाणी टंचाईने त्रस्त झालेली जनता सध्या मरणयातना भोगत आहेत. तसेच ठाण्यात याच पाणी टंचाईने एक नाही तर तब्बल पाप निष्पापांचा जीव गेला. मात्र ठाण्यातील पालकमंत्री चित्रपटाच्या प्रमोशनामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे एका सामान्य माणसानी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे चांगलीच चपराक दिली आहे.
“तर देशात भाजप विरोधात चळवळी उभ्या कराव्या लागतील”; शरद पवारांनी दिला ‘हा’ इशारा
साहेब पत्रास कारण की, जीव गेलाय, पाच निष्पापांचा, पाणीटंचाईमुळे अशी पत्राची सुरूवात करत कल्याण ग्रामीणचा रहिवासी प्रमोद पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पाणी टंचाईची व्यथा मांडली आहे. त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की, देसलेपाड्यातल्या नळांना पाणी नाही, म्हणून दुसऱ्या गावच्या खदानीवर कपडे धुवायला गेलेल्या आपल्या नातवंड, सून आणि पत्नीचा चेहरा पोलीस पाटलांनी पहिला तो शेवटचा. तुम्ही सध्या वाहिन्यांवर दिसता पण चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तुम्हाला कदाचित ही दुर्दैवी घटना माहित नसेल म्हणून हा पत्रप्रपंच.
फर्मान, अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे, बृजभुषण यांना प्रत्युत्तर देणार का? राष्ट्रवादीचा सवाल
पाण्यासाठी वणवण, तहानेने कासावीस होणे, हे सगळं एव्हाना सवयीचे होऊन गेलंय. पण आता पुढची पायरी गाठली गेली हो. पाण्यामुळे मृत्यु झालाय. एक दोघांचा नाही तर ५ निष्पाप जीवांचा. तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, ‘पाण्यापायी जीव गेला’ हे एकून तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील. आता त्याच डोळ्यातून थोडं वास्तवाकडे पहा. या सगळ्याला जबाबदार कोण? पाणी द्या, पाणी द्या सांगून २७ गावं गेली अनेक वर्ष उर बडवतायत. पण तुम्ही ज्यांना आयुक्त म्हणून नेमलेय त्यांच्या कानाशी तो आवाज पोहोचतच नाहीय. वारंवार वृत्तपत्रातून आणि माध्यमातून ‘पाणीबाणी’ जाहीर होत असते, पण बहुतेक आपण नेमलेले (की निर्ढावलेले) आयुक्त त्या बातम्यांना केराची टोपलीच दाखवतात.
बृजभुषण सिंह देखील राज्यपालांच्या वाटेवर; म्हणाले की, संत रामदास ना होते तो शिवराय ना होते
आमच्या नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणायचं आणि तेच पाणी पिऊन जगा असं सांगायचं. तहान भागवण्यासाठी आयुक्तांनी केलेली योजना तर नाही ना ही? आता तर रडून भेकून डोळेही कोरडे पडले, आता काय ? अजून काही मृत्यु व्हायची वाट पाहायची का? म्हणजे आणखी डोळ्यातून पाणी येईल हो, पण नळाला येणार नाही. आमच्या जीवावर उठलेला असा आयुक्त आम्हाला नको शिंदे साहेब… आमच्या पाणी टंचाई विरोधातला आक्रोश पाहून ज्याच्या काळजाला पाझर फुटेल असा आयुक्त हवाय आयुक्त हटवा, आमचा जीव वाचवा !
बृजभुषण सिंह देखील राज्यपालांच्या वाटेवर; म्हणाले की, संत रामदास ना होते तो शिवराय ना होते
कल्याण ग्रामीण मतदार संघातील रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी, कचरा व इतर समस्या आपल्याकडे मांडण्यासाठी मी अनेक वेळा आपल्या सोबत संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन बैठक लावावी यासाठी विनंती केली आहे. परंतु यात कोणते राजकारण आडवे येते हे मला समजत नाही आणि जर तसे काही असेल तर राजकारण बाजूला ठेवू या आणि ‘मृत्युकारण’ तपासून पाहूया. म्हणूनच मी आमदार असलो तरी हे पत्र मी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला पाठवतो आहे. बघू-पाहू-करु हे न करता ताबडतोब कृतीची अपेक्षा आहे. ताबडतोब बैठक घ्या, ताबडतोब निर्णय घ्या, आणि ताबडतोब न्याय द्या, लाथ माराल तिथे पाणी काढणारे तुम्ही कुठे आणि कशी लाथ मारायची ते तुम्हाला नक्कीच माहिती असणार. बैठकीच्या निरोपाची वाट पाहतोय. धन्यवाद ! आपला पाणीभिलाषी, प्रमाद (राजू) रतन पाटील कल्याण ग्रामीणचा एक सामान्य नागरीक.
Read also:
- “कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी अयोध्येला जाणारच”; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा इशारा
- “संदीप देशपांडे यांना पोलीस असे काही शोधत आहेत की, ते जणू पाकिस्तानातून आलेले अतिरेकी”; राज ठाकरे
- “आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”; भोंग्याबाबत राज ठाकरे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा
- न्यायालयाच्या निकालामुळे मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण घालवले, अशी कबुली भाजप देणार का?
- “सतत न्यायालयाची बोलणी खाणाऱ्या निरुपयोगी सरकारला जनता माफ करणार नाही”; चंद्रकांत पाटील