मुंबई : बृजभुषण सिंह यांनी आपल्या खासदार म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. त्या बोलतात म्हणून सर्व उत्तर प्रदेश बोलत नाही. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंरतु उत्तर प्रदेश आणि बिहारची जनता राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी अयोध्येला जाणारच असा इशारा देखील मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.
फर्मान, अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे, बृजभुषण यांना प्रत्युत्तर देणार का? राष्ट्रवादीचा सवाल
आमच्या पक्षाचं ठरलं आहे. त्यामुळे आम्ही 5 जूनला अयोध्याला जाणार म्हणजे जाणार आहे. राज ठाकरे यांनी मागील दोन सभेत ज्या पद्धतीचा हिंदुत्वाचा विषय काढला आणि अयोध्या दौरा जाहीर केला. त्यानंतर राज्यातील अनेक नेते अयोध्या दौरा करीत आहे. रोहित पवार, नाना पटोले आणि आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या देवांची दर्शन घेण्याची जी उत्सुकता लागल्याचं आम्हाला आंनद होत आहे. असंही ते म्हणाले.
बृजभुषण सिंह देखील राज्यपालांच्या वाटेवर; म्हणाले की, संत रामदास ना होते तो शिवराय ना होते
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर केलेला अत्याचार आम्ही विसरणार नाही. साधूसंतांनी राज ठाकरे यांना माफ केलं तरच राज ठाकरे अयोध्यात प्रवेश करतील. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. साधूसंत आणि अयोध्यावासी राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
बृजभुषण सिंह देखील राज्यपालांच्या वाटेवर; म्हणाले की, संत रामदास ना होते तो शिवराय ना होते
आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि नंतर अचानक राम भक्त बनायचं. हे जनतेच्याही लक्षात येत आहे. अयोध्यातील जनता राज ठाकरेंवर नाराज आहे. साधूसंतांनी राज ठाकरेंवर रोष व्यक्त केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय आणि मध्य भारतीय लोकांमध्ये भांडण लावण्याचं काम केलं आहे आणि आज अचानक त्यांचं ह्यदय परिवर्तन झालं आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही अटीशिवाय माफी मागावी. त्यामुळे राज ठाकरे यांचा विरोध कायम राहणार असंही ते म्हणाले.
Read also:
- “संदीप देशपांडे यांना पोलीस असे काही शोधत आहेत की, ते जणू पाकिस्तानातून आलेले अतिरेकी”; राज ठाकरे
- “आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”; भोंग्याबाबत राज ठाकरे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा
- न्यायालयाच्या निकालामुळे मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण घालवले, अशी कबुली भाजप देणार का?
- “सतत न्यायालयाची बोलणी खाणाऱ्या निरुपयोगी सरकारला जनता माफ करणार नाही”; चंद्रकांत पाटील
- “तर देशात भाजप विरोधात चळवळी उभ्या कराव्या लागतील”; शरद पवारांनी दिला ‘हा’ इशारा