भंडारा : भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यपदाच्या निवडणुकीत बंड केल्याने भाजपला पराभवाचा सामाना करावा लागला. त्यामुळे या निवडणुकीत काॅंग्रेसला अध्यक्षपद मिळालं. भाजपला हा पराभव पचला नसल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार चरण वाघमारे यांना पक्षातून सहा वर्ष निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यायालयाच्या निकालामुळे मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण घालवले, अशी कबुली भाजप देणार का?
चरण वाघमारे यांनी बंड केल्याने अध्यक्षपदी काॅंग्रेसचे गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या फुटीर गटाचे संदीप टाले निवडणुन आले आहेत. चरण वाघमारे यांचा एक काॅंग्रेससोबत गेल्याने भाजपला पराभवाचा सामाना करावा लागला. त्यामुळे भंडारा निवडणुकीत चरण वाघमारे यांनी केलेली कृती योग्य नाही. पक्षादेश त्यांनी मान्य केला नाही. त्यामुळे त्यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. यासोबत मोहाडी तालुका, तुमसर शहर व तुमसर ग्रामीण या कार्यकारिणीही बरखास्त करण्यात येत आहे. असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
“सतत न्यायालयाची बोलणी खाणाऱ्या निरुपयोगी सरकारला जनता माफ करणार नाही”; चंद्रकांत पाटील
भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वाघमारे यांच्या बंडखोर गटाचे 5 आणि 1 अपक्ष अशा सदस्यांनी सर्वाधिक 21 सदस्य असलेल्या काॅंग्रेसला पाठिंबा दिला. त्यांना बसपा 1, शिवसेना 1 वंचित 1 आणि अपक्ष 2 अशा सदस्यांचा पाठिंबा मिळला. तर भाजपमधील आमदार परिणय फुके आणि खासदार सुनिल मेंढे यांच्या 7 सदस्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला साथ दिली. राष्ट्रवादीचे सदस्य 13 असून भाजप आणि राष्ट्रवादी विरोधी बकावर बसले.
फर्मान, अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे, बृजभुषण यांना प्रत्युत्तर देणार का? राष्ट्रवादीचा सवाल
दरम्यान, चरण वाघमारे यांना पक्षातून निलंबित करताच काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना पक्षात येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. चरण वाघमारे यांच्यासारखा विकास पुरूष मिळाला तर पक्षाला खुप फायदा होईल. मात्र चरण वाघमारे यांनी अजून पुढची भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे पुढे ते कोणत्या पक्षात जाणार ते आता पहाणं महत्वाचं ठऱणार आहे.
Read also:
- “तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं”
- साहेब..पत्रास कारण की, जीव गेलाय,’पाणीटंचाईने’ पाच निष्पंपाचा! एकनाथ शिंदेंना काळीज पिळवटून टाकणारं पत्र
- “कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी अयोध्येला जाणारच”; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा इशारा
- “संदीप देशपांडे यांना पोलीस असे काही शोधत आहेत की, ते जणू पाकिस्तानातून आलेले अतिरेकी”; राज ठाकरे
- “आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”; भोंग्याबाबत राज ठाकरे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा