पुणे : राज्यात सध्या राष्ट्रावादी काॅंग्रेसवर विरोधी पक्ष जोरदार टिकास्त्र सोडत आहेत. यातच आता मनसेने उडी घेतल्याने राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं आहे. मागील काही राजकीय घटनांचा विचार केल्यास भाजप महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टिका करीत आहेत. अशातच आता निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
“सतत न्यायालयाची बोलणी खाणाऱ्या निरुपयोगी सरकारला जनता माफ करणार नाही”; चंद्रकांत पाटील
ते म्हणाले की, ४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, पन्नास वर्ष आमदार किंवा खासदार, अनेक संस्थांवर अध्यक्ष तरी पवार साहेब बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वगैरे वर भाष्य करतात. मग प्रश्न पडतो इतके वर्ष तुम्ही काय केलं? तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. असंही ते म्हणाले.
फर्मान, अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे, बृजभुषण यांना प्रत्युत्तर देणार का? राष्ट्रवादीचा सवाल
मुंबईची व महाराष्ट्राची सगळी कामं पूर्ण झाली आहेत, एकही काम शिल्लक नाही म्हणून शिवसेनेचे नेते मंडळी नवनीत राणा MRI मशीन मध्ये त्यांची तपासणी होताना बाहेरून फोटो कोणी काढला हे शोधण्यासाठी स्वतः लीलावती हॉस्पिटलला गेले, हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा व गंभीर झाला आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
बृजभुषण सिंह देखील राज्यपालांच्या वाटेवर; म्हणाले की, संत रामदास ना होते तो शिवराय ना होते
दरम्यान, लीलावती हॉस्पिटलमध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना युनियन आहे, मागच्या ३ वर्षापासून कर्मचारी युनियनशी जोडलेले आहेत, सातत्याने कराराबद्दल तक्रारी व मॅनेजमेंट सोबत मिटिंग करावी यासाठी नेत्यांकडे ३ वर्ष विनंती करतायत. अखेर सेनेची मंडळी आली पण कर्मचार्यांसाठी नाही तर नवनीत राणांसाठी. असंही ते म्हणाले.
Read also:
- साहेब..पत्रास कारण की, जीव गेलाय,’पाणीटंचाईने’ पाच निष्पंपाचा! एकनाथ शिंदेंना काळीज पिळवटून टाकणारं पत्र
- “कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी अयोध्येला जाणारच”; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा इशारा
- “संदीप देशपांडे यांना पोलीस असे काही शोधत आहेत की, ते जणू पाकिस्तानातून आलेले अतिरेकी”; राज ठाकरे
- “आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”; भोंग्याबाबत राज ठाकरे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा
- न्यायालयाच्या निकालामुळे मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण घालवले, अशी कबुली भाजप देणार का?