पुणे : महाराष्ट्रात एव्हाना महागाईचा ड्रग्नन जिवंत होत चालला आहे. कारण मोठ्या प्रमाणात होणारी इंधनदरवाढीमुळे सामान्य लोकांचं कंबरडं मोडलं आहे. केंद्रात भाजपची सत्ता येण्याअगोदर नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनाच्या घोषणा केली होती. मात्र ती घोषणा सध्या पाण्यावर तरंगताना दिसत आहे. कारण दिवसेंदिवसे पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केंद्र सरकार विरोधात आंदोलन केलं.
“कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी अयोध्येला जाणारच”; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा इशारा
महागाईमुळे आज सामान्य जनता त्रस्त झाली आहे. आज लिंबू, कोथिंबीर, आंबा सामान्यांनी खायचा कसा? अशा प्रश्न पडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी गॅसवरील टॅक्स कमी करुन एक हजार रुपये माफ केले. तरीही केंद्र सरकार महागाईचे खापर महाराष्ट्र राज्यावर फोडत आहे. मग आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये कुणामुळे महागाई वाढतेय? आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे, असे चालत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी आणि महागाईवर तोडगा काढावा, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
“संदीप देशपांडे यांना पोलीस असे काही शोधत आहेत की, ते जणू पाकिस्तानातून आलेले अतिरेकी”; राज ठाकरे
शनिपार चौक, पुणे येथे वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने श्री हनुमानाची आरती करून महागाई कमी करण्याचे साकडे घालत आंदोलन करण्यात आले. यावेळी सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनात महागाईची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘कमळाबाई’ ची आरती करण्यात आली. या आंदोलनासाठी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, निलेश निकम, नगरसेवक प्रदीप गायकवाड, प्रदीप देशमुख, महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर , कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे, रुपाली ठोंबरे पाटील आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”; भोंग्याबाबत राज ठाकरे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा
दरम्यान, केंद्रात युपीए सरकार असताना स्व. सुषमा स्वराज गॅस सिलिंडर ३५० रुपये झाला म्हणून आंदोलन करत होत्या. त्यांचे त्यावेळचे भाषण आजही माझ्या लक्षात असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है, तब धान लगता है. सुषमाजींचे हेच शब्द वापरुन सुप्रियाताईंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला. “मोदीजी आम्ही तुमच्यावर नाराज नाही, आम्ही हैराण आहोत. इतकी असंवेदनशीलता कशी दाखवता? तुमचे सरकार इतके असंवेदनशील कसे? सगळ्या राज्यांना विश्वासात घेऊन चर्चा करा आणि मार्ग काढा” असंही त्या म्हणाल्या.
Read also:
- मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादीने काॅंग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसला; नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- किरीट सोमय्यांनी एका शिपायाकडून लाखो रूपये उकळले; राऊतांचा सोमय्यांवर राजकीय प्रहार
- भाजपमध्ये बंडखोरी करताच चंद्रकांत पाटलांनी माजी आमदाराला केलं 6 वर्ष निलंबित; काॅंग्रेसला फायदा झाल्याचा राग
- “तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं”
- साहेब..पत्रास कारण की, जीव गेलाय,’पाणीटंचाईने’ पाच निष्पंपाचा! एकनाथ शिंदेंना काळीज पिळवटून टाकणारं पत्र