भंडारा : महाविकास आघाडीमधील जी काही राजकीय नेत्यांची अंतर्गत खदखद आहे. ती आता कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुढे येत आहे. विकास निधीवर शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर नाराजी दाखवत महाविकास आघाडी सरकारला घराचा आहेर देण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी काॅंग्रेसने राष्ट्रवादी काॅंग्रेसवर मोठा आरोप केला आहे. त्याचं कारण भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यपदाच्या निवडणुक ठरलं आहे.
“संदीप देशपांडे यांना पोलीस असे काही शोधत आहेत की, ते जणू पाकिस्तानातून आलेले अतिरेकी”; राज ठाकरे
गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभापतीच्या निवडणुकीत पटोले विरूद्ध पटेल असा राजकीय संघर्ष बघायला मिळाला. त्यामुळे मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काॅंग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहे. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असं ट्विट करत नाना पटोले यांनी राष्ट्रवादी विरोधात राजकीय बॉम्ब टाकला.
“आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”; भोंग्याबाबत राज ठाकरे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा
भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वाघमारे यांच्या बंडखोर गटाचे 5 आणि 1 अपक्ष अशा सदस्यांनी सर्वाधिक 21 सदस्य असलेल्या काॅंग्रेसला पाठिंबा दिला. त्यांना बसपा 1, शिवसेना 1 वंचित 1 आणि अपक्ष 2 अशा सदस्यांचा पाठिंबा मिळला. तर भाजपमधील आमदार परिणय फुके आणि खासदार सुनिल मेंढे यांच्या 7 सदस्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला साथ दिली. राष्ट्रवादीचे सदस्य 13 असून भाजप आणि राष्ट्रवादी विरोधी बकावर बसले.
न्यायालयाच्या निकालामुळे मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण घालवले, अशी कबुली भाजप देणार का?
दरम्यान, भंडाऱ्यात राजकीय खेळीचे पडसाद गोंदियात उमटले. त्याठिकाणी काॅंग्रेसला सुरूंग लावण्याचा प्रयत्न भाजप आणि राष्ट्रवादीने केला होता. परंतु भाजपने राष्ट्रवादीशी युती करत जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत करून काॅंग्रेसची कोंडी केली. त्यामुळे नाना पटोले राष्ट्रवादी काॅंग्रेसवर नाराज असल्याचं बोलण्यात येत आहे.
Read also:
- किरीट सोमय्यांनी एका शिपायाकडून लाखो रूपये उकळले; राऊतांचा सोमय्यांवर राजकीय प्रहार
- भाजपमध्ये बंडखोरी करताच चंद्रकांत पाटलांनी माजी आमदाराला केलं 6 वर्ष निलंबित; काॅंग्रेसला फायदा झाल्याचा राग
- “तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं”
- साहेब..पत्रास कारण की, जीव गेलाय,’पाणीटंचाईने’ पाच निष्पंपाचा! एकनाथ शिंदेंना काळीज पिळवटून टाकणारं पत्र
- “कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी अयोध्येला जाणारच”; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा इशारा