सोलापुर : महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असतानाही विरोधी पक्षाकडून टीकेचा भडीमार झाला. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश राज्यालाही ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवता आलेले नाही. असा घणाघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर केला आहे.
राज ठाकरे यांना मुस्लिम संघटनांकडून धमक्या; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट घेणार
राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी राज्य सरकारवर केलेली टीका योग्य नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यात ओबीसी आरक्षणाविना निवडणुका लढाव्या लागणार आहेत. कोर्टाच्या आदेशाचा अवमान राज्य सरकार करणार नाही. परंतु बांठीया समितीकडून पुढील दोन महिन्यात इम्पीरिकल डाटा गोळा झाला तर निर्णय वेगळाही लागू शकतो. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत हा महाविकास आघाडी सरकाराचा प्रयत्न आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
मोदीजी, आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है, तो धान, रोटी लगती है; सुप्रियाताई सुळे
भारताशेजारी असलेल्या श्रीलंका देशात महागाईमुळे लोक रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात उग्र आंदोलन करत आहेत. भारतात देखील महागाईने उच्चांक गाठला असून सामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. त्यामुळेच पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी योजनाही अपयशी ठरण्याच्या मार्गावर आहे. मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेची सुरुवात केली. देशातील कोट्यवधी गृहिणी चुलीसमोर बसून स्वयंपाक करतात म्हणून ही योजना सुरु केली. त्याच्या जाहिरातीवरही हजारो कोटी खर्च केले. मात्र गॅस दरवाढीमुळे ही योजना आता पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचंही त्यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारने वेळीच यातून धडा घेतला नाही तर महागाईचा भस्मासूर अधिक उग्र रूप धारण करणार आहे. असा इशारा देखील जयंत पाटील यांनी दिला आहे. भाजप सध्या विविध मुद्दावरून सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु तितकाच जोरदा प्रत्युत्तर सरकारकडून दिलं जात आहे.
Read also:
- “माणसं जमा करायला शिवसेनेला राज ठाकरेंचा आधार घ्यावा लागतो का?”; शिवसेनेच्या टिझरमध्ये राज यांच्या सभेतील दृश्य
- राजद्रोहाच्या कलमामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे; छगन भुजबळ
- राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल! मनसे आक्रमक
- राणा दाम्पत्य मुंबई मनपा निवडणुकीत उतरणार; उद्धव ठाकरे CM झाल्यापासून राज्याची दुर्दशा
- “राजद्रोहाच्या कलमाचा फेरविचार झाला पाहिजे, नाहीतर रद्द करायला हवा”; जितेंद्र आव्हांडाची प्रतिक्रिया