मंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत राज्यात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलीसांनी धरपकड करण्यास सुरूवात केली आहे. काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे पुन्हा एकदा इशारा दिला आहे. परंतु मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे मनसेला धमक्या येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्यांनी एका शिपायाकडून लाखो रूपये उकळले; राऊतांचा सोमय्यांवर राजकीय प्रहार
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली आहे की, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे आम्हाला काही मुस्लिम संघटनांकडून धमक्या येत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर संपुर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची देखील भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली. त्याची माहिती अद्यापही समोर आली नाही.
राज ठाकरे यांनी पत्राद्वारे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा इशारा दिला आहे. त्यात त्यांनी आता आमचा सहनशिलतेचा अंत पाहू नका, असंही म्हटलं आहे. तसेच संदीप देशपांडे सह मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत की, जणू ते पाकिस्तानचे दहशतवादी आहेत. यामुळे परत एकदा मशिदीवरील भोंग्याबाबतचा मुद्दा चर्चेत आला आहे.
“तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं”
दरम्यान, अयोध्या दौऱ्याबाबत बाळा नांदगावकर काल म्हटले आहे की, आमच्या पक्षाचं ठरलं आहे. त्यामुळे आम्ही 5 जूनला अयोध्याला जाणार म्हणजे जाणार आहे. राज ठाकरे यांनी मागील दोन सभेत ज्या पद्धतीचा हिंदुत्वाचा विषय काढला आणि अयोध्या दौरा जाहीर केला. त्यानंतर राज्यातील अनेक नेते अयोध्या दौरा करीत आहे. रोहित पवार, नाना पटोले आणि आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या देवांची दर्शन घेण्याची जी उत्सुकता लागल्याचं आम्हाला आंनद होत आहे. असंही ते म्हणाले.
Read also:
- राणा दाम्पत्य मुंबई मनपा निवडणुकीत उतरणार; उद्धव ठाकरे CM झाल्यापासून राज्याची दुर्दशा
- “राजद्रोहाच्या कलमाचा फेरविचार झाला पाहिजे, नाहीतर रद्द करायला हवा”; जितेंद्र आव्हांडाची प्रतिक्रिया
- राज ठाकरे यांना मुस्लिम संघटनांकडून धमक्या; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट घेणार
- मोदीजी, आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है, तो धान, रोटी लगती है; सुप्रियाताई सुळे
- मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादीने काॅंग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसला; नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल