नाशिक : देशद्रोहचा कायद्याचा अनेक ठिकाणी दुरूपयोग झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशद्रोह कायद्याचा पुनर्विचार करायला हवा, असे सांगितले होते. याच धर्तीवर सर्वोच्च न्यायालायाने देखील या कायद्याचा पुनर्विचार करावासा वाटत आहे, हे स्वागतार्ह असल्याचं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
राजद्रोहाचा कायदा फार जुना असून त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती बदलली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकारने देखील या कायद्याचा पुनश्च विचार केला पाहिजे. या कायद्यामुळे उगीच कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले.
किरीट सोमय्यांनी एका शिपायाकडून लाखो रूपये उकळले; राऊतांचा सोमय्यांवर राजकीय प्रहार
भाजपच्या अशा धोरणांमुळे सबंध देशातील ओबीसी समाजावर संकट आले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहे. कदाचित भाजपच्या मातृसंस्थेला जे हवे आहे, ते राजकीय चाकोरीतून होत नसेल तर ते कोर्ट आणि इतर माध्यमातून होईल आणि आरक्षण नष्ट होईल असे प्रयत्न केले जात असल्याची शंका छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राबाबत जो निर्णय दिला, तोच निर्णय मध्य प्रदेशसाठी दिला आहे. मध्य प्रदेशच्या बाजूने केंद्राचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडत आहेत. आम्ही इम्पिरीकल डाटा मागत होतो, तो डाटा दिला असता तर आज इतर राज्यांवरही संकट आले नसते. त्यांनी यावेळी भेटीसाठी आलेल्या जनतेच्या समस्या जाणून घेत त्यांचे निवारण करण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले . तसेच राणा दाम्पत्यावर लावलेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले की, “जोपर्यंत कायदा आहे तोपर्यंत त्याच्या अधीन राहून कलम लावणे हे पोलिसांचे काम आहे. उद्या हा कायदा नसेल तेव्हा त्याअंतर्गत आरोप पोलिसांकडून लावले जाणार नाहीत.
Read also:
- राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल! मनसे आक्रमक
- राणा दाम्पत्य मुंबई मनपा निवडणुकीत उतरणार; उद्धव ठाकरे CM झाल्यापासून राज्याची दुर्दशा
- “राजद्रोहाच्या कलमाचा फेरविचार झाला पाहिजे, नाहीतर रद्द करायला हवा”; जितेंद्र आव्हांडाची प्रतिक्रिया
- राज ठाकरे यांना मुस्लिम संघटनांकडून धमक्या; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट घेणार
- मोदीजी, आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है, तो धान, रोटी लगती है; सुप्रियाताई सुळे