मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुढे करून आक्रमकपवित्रा घेतला आहे. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवरुन राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम देत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. आतापर्यंतच्या तिन्ही सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचे लक्तरे काढली.
“तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं”
राज ठाकरेंच्या सभांच्या धडाक्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जाहीर सभेची घोषणा केली. १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यावेळी काय तो सवाल जवाब होऊनच जाऊदे असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीच मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. टोमणे सभेला अटी- शर्ती आहेत का? असा खोचक सवाल मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.
राजसाहेबांच्या संभाजीनगरच्या सभेला अनेक अटी,शर्ती मग शिवसेना पक्षप्रमुखांच्या टोमणे सभेला काही अटी,शर्ती आहेत का ?
आमचं सरकार आल की मशिदींवरील भोंगे,रस्त्यावरील नमाज बंद करणार हे बाळासाहेबांच स्वप्न हिंदुत्वाचा हुंकार म्हणत सभा घेणारे पूर्ण करणार का?
बाकी टोमणे सभेला शुभेच्छा.!
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 12, 2022
किरीट सोमय्यांनी एका शिपायाकडून लाखो रूपये उकळले; राऊतांचा सोमय्यांवर राजकीय प्रहार
मनसे प्रवक्ते गजानन काळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ‘राजसाहेबांच्या संभाजीनगरच्या सभेला अनेक अटी, शर्ती मग शिवसेना पक्षप्रमुखांच्या टोमणे सभेला काही अटी, शर्ती आहेत का? आमचं सरकार आले की मशिदींवरील भोंगे, रस्त्यावरील नमाज बंद करणार हे बाळासाहेबांचं स्वप्न हिंदुत्वाचा हुंकार म्हणत सभा घेणारे पूर्ण करणार का? बाकी टोमणे सभेला शुभेच्छा.!,’ अशी टीका गजानन काळेंनी केली आहे.
Read also:
- भाजप की महाविकास आघाडी? काय असेल संभाजीराजे यांची पुढची राजकीय वाटचाल
- शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन; दुबईवरून पार्थिव आणण्याचे प्रयत्न सुरू
- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा पटोलेंचा इशारा
- ‘राष्ट्रवादीने सुरा खुपसला’ हा नाना पटोलेंचा आरोप चुकीचा – जयंत पाटील
- जे कुटुंब प्रेमळ तिथं भांड्याला भांड लागतंच; नाना पाटोलेंच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची सारवासारव