कल्याण – जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार, अशा बोचऱ्या शब्दांत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते कल्याणमध्ये झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. सोमय्या यांनी यावेळी रश्मी ठाकरे यांच्या मालकीच्या अलिबागमधील कथित १९ बंगल्यांच्या मुद्द्याला हात घातला.
केतकी चितळेचं डोकं फिरलं..! पवारांना उद्देशून म्हणाली की, “ऐँशी झाले आता उरक, वाट पहातो नरक”
सोमय्या यांनी आरोप केला “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांनी १९ बंगल्याच्या प्रकरणात २०१९ आणि २०२१ साली ग्रामपंचायतींना दोन पत्र लिहिलीत. पहिल्या पत्रात १९ बंगले आमच्या नावावर करा, अशी मागणी केली तर, दुसऱ्या पत्रात तिथे बंगले नव्हते, असे रश्मी ठाकरे म्हणाल्या
केतकीबाईला लवकरच जंगी चोपाची गरज; रूपाली पाटलांचा केतकीला इशारा
ही दोन्ही पत्रं दाखवत, यावर उद्धव ठाकरे कालच्या सभेत का बोलले नाहीत, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारला. तसेच ही दोन पत्र लिहिणाऱ्या २ रश्मी ठाकरे आहेत? की, एकाच रश्मी ठाकरेंनी दोन्ही पत्रे लिहिली आहेत? की, उद्धव ठाकरेंनी ही पत्रं लिहिली आहेत?
“विश्वातघात तर नाना पटोलेंनी केला”; नाना पटोलेंच्या आरोपांवर राष्ट्रवादीकडून खंडन
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यातील संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र या आरोपांबाबत कुठलेही पुरावे सादर न केल्याने मेधा सोमय्या या राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Read also:
- संजय राऊतांच्या अडचणी वाढणार, मेधा सोमय्या दाखल करणार मानहानीचा दावा
- ‘ओ खैरे व्हा आता बहिरे’; कारण मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करत नाही
- ‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान
- सदावर्तेंप्रमाणे केतकी चितळेचाही होणार महाराष्ट्र दौरा; आतापर्यंत तब्बल 12 ठिकाणी गुन्हे दाखल
- “उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्याला ब्रेक लागणे कठीण”