पुणे : भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर आरोप केले होते. त्यावर राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. अशातच आता नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काॅंग्रेसने खंडन केले आहे. यासंबंधी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अधिकृत निवेदन जारी करत भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीतील वस्तुस्थिती समोर आणली आहे.
हिंदूजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?
२०१० साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १४ सदस्य निवडून आले तेव्हा काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्याचवेळेस आमदार नाना पटोले यांनी दुसऱ्या टर्मला भाजपशी युती करून आपले विश्वासू सहकारी चंद्रशेखर ठवरे यांना अध्यक्ष केले. २०१५ मध्येदेखील अशीच रणनीती आखून काँग्रेस पक्षाने पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली. गोंदिया जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून काँग्रेस पक्षाने आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेच्या बाहेरच ठेवले. यात तत्कालीन आमदार गोपालदास अग्रवाल व आमदार नाना पटोले यांचा हात राहिलेला आहे.
रामदास कदमांची लवकरच नव्या जोशात शिवसेनेत दुसरी इनिंग सुरु होणार?
शिवाय पटोले काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतरही गोंदिया जिल्ह्यात भाजप-काँग्रेस पक्षाची युती कायम होती. २०१५ मध्येच भंडारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी करून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनविले. त्यावेळी राष्ट्रवादीला बांधकाम विभाग सभापती पद देण्याचे काँग्रेस पक्षाने मान्य केले. परंतु नाना पटोले व काँग्रेस पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण न करता राष्ट्रवादी काँग्रेसला धोका दिला. ५ वर्षांपूर्वी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस पक्षाने भाजपचे उमेदवार परिणय फुके यांना मतदान करून त्यांना विजयी केले होते.
मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या
तसेच आता सुद्धा ६ मे २०२२ रोजी काही पंचायत समिती सभापती निवडणुका संपन्न झाल्या. त्यामध्ये काँग्रेस पक्षाने तुमसर पंचायत समितीमध्ये भाजप सोबत युती करून भाजपचे सभापती व काँग्रेसचे उपसभापती निवडून आणले. परंतु या पंचायत समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीनही पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करू शकत होते. १० मे २०२२ रोजी भंडारा जिल्हा परिषद निवडणूक पार पडली यामध्येही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सोबत युती केली आहे. तसेच या निवडणुकांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे सोबत लढले असल्याची स्पष्टता प्रेस नोटमधून करण्यात आली आहे.
Read also:
- केतकीबाईला लवकरच जंगी चोपाची गरज; रूपाली पाटलांचा केतकीला इशारा
- केतकी चितळेचं डोकं फिरलं..! पवारांना उद्देशून म्हणाली की, “ऐँशी झाले आता उरक, वाट पहातो नरक”;
- “देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे सारथ्य करावे”
- अखेर राज ठाकरेंच्या सुरक्षितेत वाढ; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
- “औरंगजेबाच्या कबरावर फुलं वाहिली हे मी फक्त ठाकरे सरकारच्या काळात पाहिले”