मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्याला जाणार आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला. मात्र राज ठाकरेंच्या दौऱ्याला सिंह यांनी विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही, असे तुम्ही स्वतः म्हणता. पण, आपले सरकार सिंह यांच्या रूपाने एका बाजूने ठाकरेंना विरोध करते. ही दुटप्पी भूमिका घेण्यापेक्षा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे आपण स्वतः सारथ्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
मंत्रालयासमोरच कुटुंबीयांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सावधगिरीने मोठा अनर्थ टळला
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला होत असणाऱ्या विरोधावर फडणवीस यांनी भाष्य केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने युवकचे जिल्हाध्यक्ष कडलग यांनी पत्रक काढून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
यात फडणवीसांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे सारथ्य करावे म्हणजे माहाराष्ट्राचा नेता भाजप सरकार व उत्तरप्रदेशमधून सुरक्षित परत येईल, असे कडलग म्हणाले आहेत. बगल मे छुरी और मुँह मे राम हे असे कशाला? आता जनतेला उल्लू बनवण्याचे काम करू नका. महाराष्ट्राचा नेता उत्तर प्रदेशमधून सुरक्षित आणण्याचा विडा उचला. म्हणजे खऱ्या अर्थाने समर्थन होईल,असा टोलाही कडलग यांनी पत्राच्या माध्यमातून फडणवीसांना लगावला.
“उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर”; उद्धव ठाकरेंच्या तोंडी शरद पवारांची भाषा; भाजपाचा टोला
दरम्यान रामाच्या चरणी जो जात असेल त्याला जाऊ द्यावे, विरोध करण्याचे काहीच कारण नाही, असे फडणवीस बृजभूषण सिंह यांना म्हणाले होते.
Read also:
- अखेर राज ठाकरेंच्या सुरक्षितेत वाढ; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
- “औरंगजेबाच्या कबरावर फुलं वाहिली हे मी फक्त ठाकरे सरकारच्या काळात पाहिले”
- हिंदूजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?
- रामदास कदमांची लवकरच नव्या जोशात शिवसेनेत दुसरी इनिंग सुरु होणार?
- मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या