मुंबई : राज्यात सध्या महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सामान्य माणुस हैराण झाला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव जाधव या शेतकऱ्यांनी ऊसाला योग्य हमीभाव मिळत नसल्या कारणाने जिवन संपवलं. अशातच आज मुंबईतील मंत्रालयासमोर नांदेड येथील एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात असून राज्य सरकारवर टिकाही होत आहे.
भाजपने आखली रणनीती; शिवसेनेला घेरण्यासाठी आता अमित शहा येणार !
नांदेडमधील राजून चिनाप्पा मुरगुडे हे आपल्या मागण्यसाठी गेल्या काही दिवसापासून उपोषण करीत होते. मात्र त्याची दखल कोणत्याही मंत्र्यांनी, ना अधिकाऱ्यांनी घेतली. शेवटी त्यांनी आज दुपारीच मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या कऱण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सावधगिरीने राजू मुरगुंडे यांना आत्महत्या करण्यावाचून रोखण्यात यश आलं. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले.
संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार; ‘या’ संघटनेची केली मोठी घोषणा
बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून नाहक त्रास दिला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे मागील 8 महिन्यापासून त्यांनी मंत्रालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केलं होतं. मागण्या पुर्ण होत नसल्यामुळे तसेच कुणीही दखल घेत नसल्याने अखेर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मंत्रालयात मोठी खळबळ उडाली होती. तर पोलिसांची देखील तारांबळ उडाली.
“टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?”, मनसेचा शिवसेनेला पुन्हा टोमणा
दरम्यान, मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. कोरोना काळात तसेच लॉकडाऊनच्या वेळी मंत्रालयात परवानगीशिवाय येता य़ेत नसल्याने या घटनांचा प्रमाण कमी झाला होता. मात्र अशा घटनांनामध्ये आता वाढ होत असून राज्यातील सामान्य माणूस आता राज्य सरकारला या बद्दल प्रश्न विचारू लागला आहे.
Read also:
- “संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय, हा रोजचा तमाशा बंद करा”
- राष्ट्रवादीत इनकमिंगचा धडाका; विविध पक्षातील नेत्यांनी बांधले घड्याळ
- ‘राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या’; मिलिंद एकबोटे यांची मागणी
- “संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही…”; मनसेने केली टिंगल
- “कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नका”; अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन