बुलढाणा – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंगला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विविध पक्षांमधील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.
राजद्रोहाच्या कलमामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे; छगन भुजबळ
यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विदर्भात जेवढा पक्ष वाढायला हवा तेवढा पक्षा वाढलेला नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. देशात महागाईने जनता होरपळत आहे, मागील दोन वर्ष कोरोनामुळे जनतेने मोठा त्रास सहन केला आहे. तसेच इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे असताना त्यातून जनतेला बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु आहे. मात्र काहीजण वेगळे विषय काढून दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत, असा टोला अजितदादांनी विरोधकांना लगावला. तसेच कायदा व सुव्यवस्था चांगली असेल तर समाधानाने काम करता येते. राज्य सरकार बळीराजाच्या हितासाठी काम करत आहे. जे विकेल ते पिकेल या दृष्टीने सरकार पावले टाकत आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
मस्तवाल झालेल्या या सरकारने राज्यात अक्षरश: हैदोस घातलाय; दरेकरांची राज्य सरकारवर खरमरीत टिका
पक्षप्रवेश झालेल्या सर्व मान्यवरांचे बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादीत स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राजकीय जीवनात काम करताना एक खमक्या नेतृत्वाची गरज असते. त्यामुळे पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांना अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळेल असे ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यात प्रभाव टाकणारे मान्यवर आपल्या पक्षात येत आहेत यातून पक्षाला नक्कीच बळकटी मिळेल, असा विश्वास राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी व्यक्त केला.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे अशी खूप पत्रं येत असतात”; संजय राऊत यांनी केले तिरकस भाष्य
परिषद निवडणुकीच्या केळवद जिल्हा परिषद सर्कलच्या माजी सदस्या डॉ. ज्योती खेडेकर यांनी आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात त्यांनी हातावर घड्याळ बांधले. यावेळी त्यांच्यासमवेत अमोल खेडेकर यांनीसुद्धा प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत त्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
Read also:
- चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी अन् मनसेचे नेते लावले गळाला; पुण्यात पार पडला पक्षप्रवेश
- ‘राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या’; मिलिंद एकबोटे यांची मागणी
- “संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही…”; मनसेने केली टिंगल
- “कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नका”; अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन
- भाजपने आखली रणनीती; शिवसेनेला घेरण्यासाठी आता अमित शहा येणार !